शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

CoronaVirus: गोव्यानंतर आणखी एक राज्य कोरोनामुक्त; छोट्या राज्यातून आली मोठी बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:45 IST

संपूर्ण ईशान्य भारतात आजघडीला एकही नवा रुग्ण नाही

इम्फाळ : मणिपूर राज्य कोरोना संसर्गापासून मुक्त झाल्याची अतिशय आनंदाची बातमी मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांनी सोमवारी साऱ्या देशाला दिली. या राज्यात असलेले कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले.ईशान्य भारतामध्ये कोरोनाचा फैलाव कमी झाला असून तिथे सोमवारपासून काही ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. आसाममध्ये गेल्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ३४ झाली असून, त्यातील एक जण मरण पावला. या राज्यातील कोरोना रुग्णांपैकी १७ जण उपचारानंतर पूर्ण बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांनाही त्यांची प्रकृती ठीक होताच रुग्णालयातून घरी पाठविले जाईल.रुग्णाने प्रवासाची माहिती लपविलीगेल्या महिन्यात चीनमधून आसाममध्ये परतलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. या विदेश प्रवासाची माहिती दडवून ठेवल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. ईशान्य भारतातील कोरोनाचा पहिला रुग्ण मणिपूरमध्येच आढळून आला होता. या व्यक्तीने कोलकाता व इम्फाळ येथे वास्तव्य केले होते. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे २५ मार्च रोजी वैद्यकीय चाचणी अहवालातून स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या किती जण संपर्कात आले होते याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या राज्यात सुदैवाने कोरोनाचे दोनच रुग्ण आढळून आले होते.सर्वांचे सहकार्य, नियमांच्या पालनामुळे यशमणिपूरमध्ये रविवारपासून कोरोना विषाणूचे नवे रुग्ण आढळून आलेले नाहीत. केवळ मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतातील इतर सात राज्यांत एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. जनतेने दिलेले सहकार्य व डॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम व लॉकडाऊनच्या नियमांची केलेली कडक अंमलबजावणी यामुळेच मणिपूर कोरोना विषाणूमुक्त होऊ शकले.-एन. बिरेनसिंह, मुख्यमंत्री, मणिपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा