शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गलवाननंतर आता चीन लडाखमधील या भागात घुसखोरीच्या तयारीत,सुरू केली  सैनिक, वाहनांची जमवाजमव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 19:20 IST

भारतीय लष्कराने गलवानमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता चीनने लडाख आणि अक्साई चीन भागात सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय भूभागांच्या दिशेने आपला मोर्चा वळवण्याची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देपूर्व लडाखमधील काही नव्या भागात चीनच्या बाजूने जमवाजमवभारतासाठी सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दौलत बेग ओल्डी आणि डेपसांग या भागात चीनकडून मोर्चा उघडण्यात येण्याची शक्यताडेपसांग भागाताच चिनी सैन्याने २०१३ मध्ये घुसखोरी केली होती

लेह (लडाख) - गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही चिनी सैन्य माघार घेण्याचे संकेत दिसून येत नाही आहेत. सीमेवर सज्ज असलेल्या भारतीय लष्कराने गलवानमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता चीननेलडाख आणि अक्साई चीन भागात सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय भूभागांच्या दिशेने आपला मोर्चा वळवण्याची तयारी सुरू केली आहे.

पूर्व लडाखमधील काही नव्या भागात चीनच्या बाजूने जमवाजमव सुरू झाली असून, त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीकडून भारतासाठी सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दौलत बेग ओल्डी आणि डेपसांग या भागात मोर्चा उघडण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.  

याबाबतचं वृत्त इंडिया टुडे आणि आज तकने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या वृत्तानुसार दौलत बेग ओल्डी परिसरात चिनी सैन्याकडून जमवाजमव सुरू झाली आहे. जून महिन्यामध्ये चीनच्या तळाजवळ कॅम्प आणि वाहनांची वर्दळ दिसून आली आहे. चीनने हा तळ २०१६ पूर्वीच बनवला होता. मात्र आता तिथे नवे बांधकाम तसेच वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच जमिनीवरील ट्रॅकिंगमधून याला दुजोराही मिळाला आहे.

दरम्यान, चीन डेपसांग भागात जमवाजमव करू शकतो, याची कुणकुण भारताला मेच्या अखेरीसच लागली होती. तेव्हापासून या भागातील लष्कराची उपस्थिची भक्कम करण्यात आली होती. डेपसांग भागाताच चिनी सैन्याने २०१३ मध्ये घुसखोरी केली होती.  

एकीकडे सीमेवर सैन्य आमनेसामने येत असताना दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. सैनिकी स्तरावरील चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशामध्ये राजनयिक स्तरावरील चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे संयुक्त सचिव आज चर्चा करण्य्ची शक्यता आहे. त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव करतील. तर चीनकडून डीजी सीमा विभाग या चर्चेत सहभागी होतील. यापूर्वी दोन्ही देशात कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यामध्ये चीन जेव्हा  ५ मे रोजी असलेल्या पूर्वस्थितीत जाईल तेव्हाच वाद निवळेल असे स्पष्ट केले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतIndian Armyभारतीय जवानchinaचीन