शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:42 IST

दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता पटनायक यांनी व्यक्त केली आहे.हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आता फक्त शेवटचा टप्पा उरलाय. १९ मे रोजी आठ राज्यांमधील ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडतोच आहे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. असं असताना, निवडणुकीच्या मैदानात आमनेसामने उभे ठाकलेले दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या 'नवीन' समीकरणाला कारणीभूत ठरलं आहे, ते फनी चक्रीवादळ.

गेल्या शुक्रवारी फनी चक्रीवादळानं ओडिशामध्ये हाहाकार उडवला. या चक्रीवादळात ४१ जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानीही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिस्थितीची हवाई पाहणी करून १ हजार कोटींची तातडीची मदतही जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. 

फनी चक्रीवादळाआधी नागरिकांच्या स्थलांतराचे आणि नंतर मदत आणि पुनर्वसनाचे काम ओडिशा सरकारने उत्तम प्रकारे केल्याचं प्रशस्तीपत्रक नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांना दिलं होतं. त्यांच्या या पत्राला पटनायक यांनी उत्तर पाठवलंय आणि त्यात केंद्राचे आभार मानलेत. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन नेत्यांमधील हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात, असं जाणकारांना वाटतंय. 

फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण 

लोकसभा निवडणुकीत बहुतांश प्रादेशिक पक्षांनी आपला गट जाहीर केला आहे. परंतु, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी आपले पत्ते उघडलेले नाहीत. गेल्या वेळी ओडिशातील २१ पैकी २० खासदार बीजेडीचे होते. यावेळीही त्यांना तसंच यश मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकसभा त्रिशंकू झाल्यास त्यांची भूमिका निर्णायक असेल. बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कधीच नवीन पटनायक यांनी काँग्रेसशी 'हात'मिळवणी केलेली नाही. परंतु, यावेळच्या निवडणुकीत ते भाजपापासूनही दूरच राहिले होते. या पार्श्वभूमीवर, मोदी आणि पटनायक यांच्यातील पत्रव्यवहार, भले औपचारिक असला तरी मैत्रीचे पूल बांधणारा ठरू शकतो.

दरम्यान, फनी चक्रीवादळाचा तडाखा अनेक भागांना बसलाय. सुमारे ५ लाख घरांचं नुकसान झालंय. ही घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधी देण्याची विनंती नवीन पटनायक यांनी केली आहे. या योजनेतील नव्या तरतुदीनुसार, घरबांधणीचा ९० टक्के खर्च केंद्र सरकार देतं. आता पंतप्रधान ही विनंती मान्य करून जवळीक आणखी वाढवतात का, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019Narendra Modiनरेंद्र मोदी