शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 12:13 IST

डॉ. अंजू शर्मा या १९९१ च्या बॅचच्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी आहेत.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. डॉ. अंजू शर्मा या १९९१ च्या बॅचच्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. आपली मेहनत, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेलं वेड या गोष्टींमुळे त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. मूळच्या राजस्थानमधील भरतपूर येथे राहणाऱ्या डॉ. अंजू स्वतःच्या चुकांमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झाल्या. पण नंतर त्या चुकांमधून शिकल्या.

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC परीक्षा उत्तीर्ण करून त्या IAS झाल्या. अपयशातून शिकून आवश्यक बदलांसह योग्य मार्गाचा अवलंब करून ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश निश्चितच मिळतं असं म्हणतात. 

गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी डॉ. अंजू यांनी १९९१ मध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी गांधीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. यानंतर त्या विशेष सचिव, नंतर सचिव, प्रधान सचिव आणि आता अतिरिक्त मुख्य सचिव या पदापर्यंत पोहोचल्या आहेत.

अपयशानंतरही मानली नाही हार 

अंजू दहावीच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. तसेच बारावीच्या परीक्षेत त्या अर्थशास्त्र विषयात पास होऊ शकल्या नाहीत. मात्र, या अपयशासमोर त्यांनी हार मानण्यास नकार दिला आणि पुन्हा एकदा अभ्यास करून, पूर्ण लक्ष केंद्रित करून सुवर्णपदक मिळवलं. जयपूर येथून बीएससी आणि एमबीए पूर्ण करून युपीएससीची तयारी सुरू केली. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

अंजू म्हणतात की, परीक्षेला बसण्यासाठी शेवटच्या क्षणाच्या तयारीवर कोणीही अवलंबून राहू नये. याचं कारण असं की जोखीम जास्त असते. तयारीसह उजळणी करण्याची संधी कमी असते. दहावी आणि बारावीमध्ये चुका झाल्या. त्यामुळे यूपीएससीच्या तयारीसाठी योग्य रणनीती आखली आणि अभ्यास केला. त्या आयएएस टॉप स्कोरर बनल्या.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी