शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे संकटमोचक मदतीला धावले; हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 08:59 IST

राज्यसभेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आली.

शिमला - हिमाचल प्रदेशातीलकाँग्रेस सरकारवरचं संकट टळलं आहे. राज्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ६ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून भाजपाला मदत केली. त्यानंतर सुखविंदर सिंह सुक्खू यांचं सरकार कोसळणार अशी शक्यता होती. परंतु ऐनवेळी काँग्रेसचे चाणक्य आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सूत्रे हातात घेतली. त्यानंतर पक्षातील मतभेद संपुष्टात आले. सुक्खू हेच मुख्यमंत्री राहतील. शिवकुमार यांच्या खेळीमुळे ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले. 

हिमाचलमधील राजकीय उलथापालथी पाहता काँग्रेसनं डीके शिवकुमार आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांना निरिक्षक म्हणून पाठवले. या दोन्ही नेत्यांनी शिमला इथं वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह, मुलगा विक्रमादित्य सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी २९ तारखेला पत्रकार परिषद घेतली. त्यात डिके शिवकुमार, भूपेंद्र हुडा, सुखविंदर सुक्खू सहभागी होते. हिमाचल प्रदेशात सर्व काही ठीक आहे. सुक्खू सरकार ५ वर्ष पूर्ण करेल. काही मुद्दे होते, त्यावर आम्ही तोडगा काढला असं शिवकुमार यांनी स्पष्ट केले. 

तर मी राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा विजय करण्यात अयशस्वी ठरलो. भाजपा आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करतेय हे आम्हाला माहिती नव्हते असं मुख्यमंत्री सुक्खू यांनी म्हटलं. तर काँग्रेसच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. सुक्खू हे मंत्री आणि आमदारांना एकत्र ठेवण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे पक्षासमोरील अडचणी वाढल्या. तत्पूर्वी पक्षाचे नेते, मंत्री विक्रमादित्य सिंह यांनीही मुख्यमंत्र्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. 

दरम्यान, राज्यसभेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आली. बंडखोर आमदारांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. हिमाचल प्रदेशात एकूण ६८ आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर काँग्रेसकडे आता ३४, भाजपाकडे २५ तर अपक्ष ३ आमदार राहिले आहेत. जर ३ अपक्ष भाजपासोबत गेले तर त्यांची संख्या २८ इतकी होती. त्यात जर बहुमत चाचणीची वेळ आली तरीही काँग्रेस सरकार सहजपणे यशस्वी होईल. परंतु जर विक्रमादित्य आणि त्यांच्या गटाने बंडखोरी केली तर सुक्खू यांचे सरकार धोक्यात येऊ शकते. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा