शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

काँग्रेसचे संकटमोचक मदतीला धावले; हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 08:59 IST

राज्यसभेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आली.

शिमला - हिमाचल प्रदेशातीलकाँग्रेस सरकारवरचं संकट टळलं आहे. राज्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ६ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून भाजपाला मदत केली. त्यानंतर सुखविंदर सिंह सुक्खू यांचं सरकार कोसळणार अशी शक्यता होती. परंतु ऐनवेळी काँग्रेसचे चाणक्य आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सूत्रे हातात घेतली. त्यानंतर पक्षातील मतभेद संपुष्टात आले. सुक्खू हेच मुख्यमंत्री राहतील. शिवकुमार यांच्या खेळीमुळे ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले. 

हिमाचलमधील राजकीय उलथापालथी पाहता काँग्रेसनं डीके शिवकुमार आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांना निरिक्षक म्हणून पाठवले. या दोन्ही नेत्यांनी शिमला इथं वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह, मुलगा विक्रमादित्य सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी २९ तारखेला पत्रकार परिषद घेतली. त्यात डिके शिवकुमार, भूपेंद्र हुडा, सुखविंदर सुक्खू सहभागी होते. हिमाचल प्रदेशात सर्व काही ठीक आहे. सुक्खू सरकार ५ वर्ष पूर्ण करेल. काही मुद्दे होते, त्यावर आम्ही तोडगा काढला असं शिवकुमार यांनी स्पष्ट केले. 

तर मी राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा विजय करण्यात अयशस्वी ठरलो. भाजपा आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करतेय हे आम्हाला माहिती नव्हते असं मुख्यमंत्री सुक्खू यांनी म्हटलं. तर काँग्रेसच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. सुक्खू हे मंत्री आणि आमदारांना एकत्र ठेवण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे पक्षासमोरील अडचणी वाढल्या. तत्पूर्वी पक्षाचे नेते, मंत्री विक्रमादित्य सिंह यांनीही मुख्यमंत्र्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. 

दरम्यान, राज्यसभेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आली. बंडखोर आमदारांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. हिमाचल प्रदेशात एकूण ६८ आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर काँग्रेसकडे आता ३४, भाजपाकडे २५ तर अपक्ष ३ आमदार राहिले आहेत. जर ३ अपक्ष भाजपासोबत गेले तर त्यांची संख्या २८ इतकी होती. त्यात जर बहुमत चाचणीची वेळ आली तरीही काँग्रेस सरकार सहजपणे यशस्वी होईल. परंतु जर विक्रमादित्य आणि त्यांच्या गटाने बंडखोरी केली तर सुक्खू यांचे सरकार धोक्यात येऊ शकते. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा