शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

काँग्रेसचे संकटमोचक मदतीला धावले; हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 08:59 IST

राज्यसभेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आली.

शिमला - हिमाचल प्रदेशातीलकाँग्रेस सरकारवरचं संकट टळलं आहे. राज्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या ६ आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून भाजपाला मदत केली. त्यानंतर सुखविंदर सिंह सुक्खू यांचं सरकार कोसळणार अशी शक्यता होती. परंतु ऐनवेळी काँग्रेसचे चाणक्य आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सूत्रे हातात घेतली. त्यानंतर पक्षातील मतभेद संपुष्टात आले. सुक्खू हेच मुख्यमंत्री राहतील. शिवकुमार यांच्या खेळीमुळे ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरले. 

हिमाचलमधील राजकीय उलथापालथी पाहता काँग्रेसनं डीके शिवकुमार आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा यांना निरिक्षक म्हणून पाठवले. या दोन्ही नेत्यांनी शिमला इथं वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह, मुलगा विक्रमादित्य सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी २९ तारखेला पत्रकार परिषद घेतली. त्यात डिके शिवकुमार, भूपेंद्र हुडा, सुखविंदर सुक्खू सहभागी होते. हिमाचल प्रदेशात सर्व काही ठीक आहे. सुक्खू सरकार ५ वर्ष पूर्ण करेल. काही मुद्दे होते, त्यावर आम्ही तोडगा काढला असं शिवकुमार यांनी स्पष्ट केले. 

तर मी राज्यसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचा विजय करण्यात अयशस्वी ठरलो. भाजपा आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करतेय हे आम्हाला माहिती नव्हते असं मुख्यमंत्री सुक्खू यांनी म्हटलं. तर काँग्रेसच्या एका गटाने मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. सुक्खू हे मंत्री आणि आमदारांना एकत्र ठेवण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे पक्षासमोरील अडचणी वाढल्या. तत्पूर्वी पक्षाचे नेते, मंत्री विक्रमादित्य सिंह यांनीही मुख्यमंत्र्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. 

दरम्यान, राज्यसभेत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या ६ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले आहे. या आमदारांची आमदारकी रद्द करण्यात आली. बंडखोर आमदारांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली. हिमाचल प्रदेशात एकूण ६८ आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर काँग्रेसकडे आता ३४, भाजपाकडे २५ तर अपक्ष ३ आमदार राहिले आहेत. जर ३ अपक्ष भाजपासोबत गेले तर त्यांची संख्या २८ इतकी होती. त्यात जर बहुमत चाचणीची वेळ आली तरीही काँग्रेस सरकार सहजपणे यशस्वी होईल. परंतु जर विक्रमादित्य आणि त्यांच्या गटाने बंडखोरी केली तर सुक्खू यांचे सरकार धोक्यात येऊ शकते. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा