शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

दिग्विजय सिंहांच्या पराभवानंतर मिर्चीबाबा जलसमाधी घेण्यास आले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 11:36 IST

मिर्ची बाबा यांनी गुरुवार 14 जुन रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून जलसमाधीस परवानगी देण्याची मागणी केली होती.

भोपाळ - लोकसभा निवडणुकांवेळी वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्या विजयाबद्दल भाकित केले होते. तसेच, जर दिग्विजयसिंह याचा पराभव झाला, तर मी जलसमाधी घेईल, अशी शपथही मिर्ची बाबा यांनी घेतली होती. त्यामुळे, दिग्विजय सिंहांच्या पराभवानंतर आपला शपथसंकल्प सोडण्यासाठी ते तलावावर गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना जलसमाधी घेण्यास मनाई केली. 

मिर्ची बाबा यांनी गुरुवार 14 जुन रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून जलसमाधीस परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये, 16 जुन रोजी दुपारी 2.11 वाजता मी जलसमाधी घेत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आणखी एक पत्र लिहून जलसमाधीवेळी सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याचे म्हटले. मात्र, भोपाळचे जिल्हाधिकारी तरुण कुमार पिथोडे यांनी मिर्ची बाबा यांच्या विनंती पत्राला हरकत घेत, ही परवानगी नाकारली आहे. तसेच, पोलिसांना बाबांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. भोपाळमधील शितलदास की बगिया या तलावावर पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. मिर्ची बाबा हॉटेलमधून निघाण्यापूर्वीच त्यांना तलावावर जाण्यास मनाई करण्यात आली. पोलिसांनी हॉटेलवरच बाबांना नरजकैदेत ठेवले आहे. त्यामुळे, जलसमाधीचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा उद्देश फसला आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी दिग्विजयसिंह यांच्या विजयासाठी मिर्ची बाबांनी यज्ञ केला होता. त्यावेळी, सिंह यांचा निश्चितच विजय होईल, असे भाकित त्यांनी केले होते. तसेच, सिंह याचा पराभव झाल्यास मी जलसमाधी घेईन, असेही मिर्ची बाबांनी म्हटले होते. त्यानुसार, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालात दिग्विजय सिंह यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह याचा तब्बल 3.64 लाख मतांनी पराभव केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहbhopal-pcभोपाळlok sabhaलोकसभा