शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिग्विजय सिंहांच्या पराभवानंतर मिर्चीबाबा जलसमाधी घेण्यास आले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 11:36 IST

मिर्ची बाबा यांनी गुरुवार 14 जुन रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून जलसमाधीस परवानगी देण्याची मागणी केली होती.

भोपाळ - लोकसभा निवडणुकांवेळी वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्या विजयाबद्दल भाकित केले होते. तसेच, जर दिग्विजयसिंह याचा पराभव झाला, तर मी जलसमाधी घेईल, अशी शपथही मिर्ची बाबा यांनी घेतली होती. त्यामुळे, दिग्विजय सिंहांच्या पराभवानंतर आपला शपथसंकल्प सोडण्यासाठी ते तलावावर गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना जलसमाधी घेण्यास मनाई केली. 

मिर्ची बाबा यांनी गुरुवार 14 जुन रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून जलसमाधीस परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये, 16 जुन रोजी दुपारी 2.11 वाजता मी जलसमाधी घेत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आणखी एक पत्र लिहून जलसमाधीवेळी सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याचे म्हटले. मात्र, भोपाळचे जिल्हाधिकारी तरुण कुमार पिथोडे यांनी मिर्ची बाबा यांच्या विनंती पत्राला हरकत घेत, ही परवानगी नाकारली आहे. तसेच, पोलिसांना बाबांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. भोपाळमधील शितलदास की बगिया या तलावावर पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. मिर्ची बाबा हॉटेलमधून निघाण्यापूर्वीच त्यांना तलावावर जाण्यास मनाई करण्यात आली. पोलिसांनी हॉटेलवरच बाबांना नरजकैदेत ठेवले आहे. त्यामुळे, जलसमाधीचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा उद्देश फसला आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी दिग्विजयसिंह यांच्या विजयासाठी मिर्ची बाबांनी यज्ञ केला होता. त्यावेळी, सिंह यांचा निश्चितच विजय होईल, असे भाकित त्यांनी केले होते. तसेच, सिंह याचा पराभव झाल्यास मी जलसमाधी घेईन, असेही मिर्ची बाबांनी म्हटले होते. त्यानुसार, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालात दिग्विजय सिंह यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह याचा तब्बल 3.64 लाख मतांनी पराभव केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहbhopal-pcभोपाळlok sabhaलोकसभा