शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

हृदयस्पर्शी! पतीचा कोरोनाने मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 16:14 IST

After death of husband woman started driving e rickshaw : कोरोनामुळे एका महिलेने आपला पती गमावला आहे. पण यानंतर तिने हार न मानता, परिस्थितीसमोर खचून न जाता या परिस्थितीचा धीराने सामना केला आहे. 

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे एका महिलेने आपला पती गमावला आहे. पण यानंतर तिने हार न मानता, परिस्थितीसमोर खचून न जाता या परिस्थितीचा धीराने सामना केला आहे. 

पतीच्या मृत्यूनंतर घरची परिस्थिती आणखी बिघडली. मुलांचं, कुटुंबियांचं पोट भरणं देखील अवघड झालं. अशावेळी महिलेने ई-रिक्षा चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आता मुलांचा सांभाळ करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या छपरा जिल्ह्याचे रहिवासी असलेले रंजन गिरी हे आपल्या पत्नी आणि मुलांसह 12 वर्षांपूर्वी फरीदाबाद येथे आले होते. ते रिक्षा चालवायचे. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी एक ई-रिक्षा घेतली आणि ती चालवून ते कुटुंबाची जबाबदारी घेत होते. त्याचवेळी त्यांची पत्नी ममता देवी एका फायबर कंपनीत नोकरी करत होती. 

नोकरी मिळत नसल्याने ई-रिक्षा चालवण्याचा घेतला निर्णय

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये पत्नीची नोकरी गेली. तसेच रंजन गिरी यांना देखील कोरोनाची लागण झाली. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूने ममता देवी यांना मोठा धक्का बसला. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही आता त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी हार नाही मानली. काहींनी त्यांना मदत केली. पण दुसऱ्याच्या मदतीवर किती दिवस अवलंबून राहणार हा प्रश्न त्यांना सतावू लागला म्हणून त्यांनी स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतला. तसेच नोकरी मिळत नसल्याने त्यांनी ई-रिक्षा चालवण्याचा मोठा निर्णय घेतला. पण हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्या ई-रिक्षा चालवायला शिकल्या आणि आता आपल्या मुलांचं पोट भरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण हार नाही मानली; रिक्षा चालवून 'तो' देतोय मुलांना शिक्षण

आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी धडपड आणि अपार कष्ट करणाऱ्या एका बापमाणसाची गोष्ट समोर आली आहे. घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण त्याने हार नाही मानली. रिक्षालाच आपलं घर बनवून तो आता मुलांना शिक्षण देत आहे. गणेश साहू असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ज्यांच्याकडे आपल्या मुलांसाठी डोक्यावर छप्पर नाही पण तरीही ते आपल्या मुलांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी झटत आहेत. आपल्या मुलांचं पालनपोषण करता यावं, त्यांचं पोट भरता यावं म्हणून ते रिक्षा चालवण्याचं काम करतात. यासोबतच मुलांना देखील स्वत:च शिकवतात. भास्कर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, गणेश साहू यांना दोन मुलं आहेत. ते आधी एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते. मात्र अतिक्रमणामध्ये त्यांची झोपडी तुटली. ज्यानंतर ते बेघर झाले. आता रिक्षाच त्यांच्यासाठी सर्वकाही आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत