शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
2
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
3
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
4
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
5
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
6
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
7
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
8
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
9
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
10
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
11
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
12
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
13
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
14
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
15
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
16
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
17
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
18
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
19
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
20
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

हृदयस्पर्शी! पतीचा कोरोनाने मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 16:14 IST

After death of husband woman started driving e rickshaw : कोरोनामुळे एका महिलेने आपला पती गमावला आहे. पण यानंतर तिने हार न मानता, परिस्थितीसमोर खचून न जाता या परिस्थितीचा धीराने सामना केला आहे. 

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे एका महिलेने आपला पती गमावला आहे. पण यानंतर तिने हार न मानता, परिस्थितीसमोर खचून न जाता या परिस्थितीचा धीराने सामना केला आहे. 

पतीच्या मृत्यूनंतर घरची परिस्थिती आणखी बिघडली. मुलांचं, कुटुंबियांचं पोट भरणं देखील अवघड झालं. अशावेळी महिलेने ई-रिक्षा चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आता मुलांचा सांभाळ करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या छपरा जिल्ह्याचे रहिवासी असलेले रंजन गिरी हे आपल्या पत्नी आणि मुलांसह 12 वर्षांपूर्वी फरीदाबाद येथे आले होते. ते रिक्षा चालवायचे. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी एक ई-रिक्षा घेतली आणि ती चालवून ते कुटुंबाची जबाबदारी घेत होते. त्याचवेळी त्यांची पत्नी ममता देवी एका फायबर कंपनीत नोकरी करत होती. 

नोकरी मिळत नसल्याने ई-रिक्षा चालवण्याचा घेतला निर्णय

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये पत्नीची नोकरी गेली. तसेच रंजन गिरी यांना देखील कोरोनाची लागण झाली. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूने ममता देवी यांना मोठा धक्का बसला. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही आता त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी हार नाही मानली. काहींनी त्यांना मदत केली. पण दुसऱ्याच्या मदतीवर किती दिवस अवलंबून राहणार हा प्रश्न त्यांना सतावू लागला म्हणून त्यांनी स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतला. तसेच नोकरी मिळत नसल्याने त्यांनी ई-रिक्षा चालवण्याचा मोठा निर्णय घेतला. पण हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्या ई-रिक्षा चालवायला शिकल्या आणि आता आपल्या मुलांचं पोट भरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण हार नाही मानली; रिक्षा चालवून 'तो' देतोय मुलांना शिक्षण

आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी धडपड आणि अपार कष्ट करणाऱ्या एका बापमाणसाची गोष्ट समोर आली आहे. घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण त्याने हार नाही मानली. रिक्षालाच आपलं घर बनवून तो आता मुलांना शिक्षण देत आहे. गणेश साहू असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ज्यांच्याकडे आपल्या मुलांसाठी डोक्यावर छप्पर नाही पण तरीही ते आपल्या मुलांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी झटत आहेत. आपल्या मुलांचं पालनपोषण करता यावं, त्यांचं पोट भरता यावं म्हणून ते रिक्षा चालवण्याचं काम करतात. यासोबतच मुलांना देखील स्वत:च शिकवतात. भास्कर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, गणेश साहू यांना दोन मुलं आहेत. ते आधी एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते. मात्र अतिक्रमणामध्ये त्यांची झोपडी तुटली. ज्यानंतर ते बेघर झाले. आता रिक्षाच त्यांच्यासाठी सर्वकाही आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत