शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

LOC: चीनच्या जिवावर उडणारा पाकिस्तान भेदरला; भारताला हॉटलाईनवर शांततेचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 13:37 IST

India Pakistan DGMO Level Talks: दोन्ही देशांच्या जनरलनी एओसीसह सर्व सीमाभागातील स्वतंत्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यास सहमती दर्शविली. एओसीबाबत जे काही याआधी समझोते झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे.

भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनने माघार घेताच त्यांच्या जिवावर भारताला आव्हाने देणारा पाकिस्तान (Pakistan) जमिनीवर आला आहे. भारताला हॉटलाईनवर आता आम्हाला एलओसीवर (Line of Control) शांती हवी आहे, अशा शब्दांत विनवणी करत आहे. आज दोन्ही देशांच्या मिलिट्री ऑपरेशन्सच्या डायरेक्टर जनरलनी (DGMO) फोनवर चर्चा केली आणि सीमेवर शांती प्रस्थापित करण्यासाठी सहमती बनविली. (Pakistan talks on Hotline with India on LOC Peace.)

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LOC) शांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने सर्व करार आणि शस्त्रसंधीचे कडक पालन करणार असल्याचे सांगितले. याला भारतानेही सहमती दिली आहे. ही शस्त्रसंधी 24-25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 

दोन्ही देशांच्या जनरलनी एओसीसह सर्व सीमाभागातील स्वतंत्र आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यास सहमती दर्शविली. एओसीबाबत जे काही याआधी समझोते झाले आहेत ते पाळण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिले आहे. तसेच कोणतीही अफवा किंवा गैरसमज दूर करण्यासाठी हॉटलाईनवर चर्चा करण्याबाबतही दोन्ही जनरलनी सहमती दर्शविली आहे. याचबरोबर बॉर्डरवर फ्लॅग मिटिंग घेण्याचे ठरविले आहे. 

Galwan Clash: चीनकडून गलवान घाटीतील हिंसाचाराचा Video जारी; म्हणाला 'भारतच हल्लेखोर'या प्रकारे एलएसीनंतर एलओसीवर देखील शांती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतू पाकिस्तानव विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी नेहमी विश्वासघात केला आहे. एकीकडे भारतावर घुसखोरी करण्याचे आरोप करायचे आणि दुसरीकडे सीमेपलिकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे असा दुटप्पीपणा पाकिस्तान करत आला आहे. चीनने भारतीय जवानांवर हल्ला केला तेव्हाही पाकिस्तानने संधी साधण्याचा प्रयत्न केला होता. सैन्याला भारताशी युद्ध करण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील भारतासोबत युद्धखोरीची भाषा केली होती. परंतू चीनची डाळ न शिजल्याने पाकिस्तान पुन्हा एकदा जमिनीवर आला आहे. 

अखेर चीनने गलवानमधील नामुष्की कबूल केलीगतवर्षी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला होता. (India China faceoff ) या तणावादरम्यान, भारतीय लष्कर (Indian Army) आणि चिनी सैन्यामध्ये (PLA) हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र चीन सरकारकडून या झटापटीत चिनी सैन्याची जीवितहानी झाल्याचे वृत्त सातत्याने नाकारले जात होते. मात्र आता चिनी सरकारने या झटापटीत आपले सैनिक मारले गेल्याचे कबूल केले आहे. तसेच या सैनिकांची नावेही जाहीर केली आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतborder disputeसीमा वादBorderसीमारेषाIndian Armyभारतीय जवान