शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना लग्नमंडपातून वधू आणि वर दोघांनीही ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 12:24 IST

मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना वधू आणि वर दोघेही लग्नमंडपातून पळून गेल्याची अजब घटना चन्नाकल मालुर येथे घडली. लग्नासाठी केलेला खर्च आणि दोन्ही कुटुंबांच्या इभ्रतीचा विचार करुन ज्येष्ठांनी या समस्येवर तोडगा काढला.

ठळक मुद्देसर्व प्रकारामुळे हताश झालेला नवरदेव मुहूर्ताच्या काहीवेळ आधी अचानक गायब झाला.   नवरदेवाकडची मंडळी पाच वाजताच हॉलवर पोहोचली, पण वधूपक्षाकडून सात वाजले तरी कोणीही आले नाही. 

कोलार - मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना वधू आणि वर दोघेही लग्नमंडपातून पळून गेल्याची अजब घटना कर्नाटकाच्या चन्नाकल मालुर येथे घडली. वर पक्षाकडची मंडळी पद्मावती कल्याण मंडप येथे वधूची वाट पाहत थांबलेले असताना वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. नवरी मुलीच्या अशा वागण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नासाठी केलेला खर्च आणि दोन्ही कुटुंबांच्या इभ्रतीचा विचार करुन ज्येष्ठांनी या समस्येवर तोडगा काढला. त्यांनी लग्नासाठी पळून गेलेल्या वधूच्या चुलत बहिणीला तयार केले. 

पण या सर्व प्रकारामुळे हताश झालेला नवरदेव मुहूर्ताच्या काहीवेळ आधी अचानक गायब झाला.   त्यामुळे अखेर हे लग्न रद्द झाले. बंगळुरुपासून 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या चन्नाकल मालुर येथे शनिवारी हे नाटय घडले. पद्मावती कल्याण मंडप हॉलमध्ये लग्नाआधीच्या विधींसाठी रिसेप्शन आयोजित केले होते. नवरदेवाकडची मंडळी पाच वाजताच हॉलवर पोहोचली. पण वधूपक्षाकडून सात वाजले तरी कोणीही आले नाही. 

संध्याकाळी सातपासून विधी सुरु होणार होते. मुलाकडच्यांनी वधूच्या आई-वडिलांशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन स्विचऑफ येत होता. काहीतरी वाईट घडलय असा त्यांना संशय आला. वरपक्षाने लगेच वधूचे गाव गाठले. त्यावेळी वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झालीय हे समजल्यानंतर वर पक्षाचा पारा चढला. दोन्ही बाजूंमध्ये बरीच वादावादी झाली. तणाव वाढला होता. 

अखेर ज्येष्ठांनी यावर तोडगा काढला आणि वधूच्या चुलत बहिणीला लग्नासाठी तयार केले. रविवारी सकाळी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली होती. दोन्हीकडचे कुटुंबिय सकाळी 8.15 ते 9 दरम्यानच्या मुहूर्ताची तयारी करत होते. पण त्याच दरम्यान वर मुलगा त्याच्या कक्षात नसल्याचे समजले. बरीच शोधाशोध करुनही वर मुलगा कुठेही सापडला नाही. अखेर दोन्हीकडच्यांनी हा विवाह मोडल्याचे जाहीर केले.