शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना लग्नमंडपातून वधू आणि वर दोघांनीही ठोकली धूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 12:24 IST

मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना वधू आणि वर दोघेही लग्नमंडपातून पळून गेल्याची अजब घटना चन्नाकल मालुर येथे घडली. लग्नासाठी केलेला खर्च आणि दोन्ही कुटुंबांच्या इभ्रतीचा विचार करुन ज्येष्ठांनी या समस्येवर तोडगा काढला.

ठळक मुद्देसर्व प्रकारामुळे हताश झालेला नवरदेव मुहूर्ताच्या काहीवेळ आधी अचानक गायब झाला.   नवरदेवाकडची मंडळी पाच वाजताच हॉलवर पोहोचली, पण वधूपक्षाकडून सात वाजले तरी कोणीही आले नाही. 

कोलार - मुहूर्ताची वेळ जवळ आलेली असताना वधू आणि वर दोघेही लग्नमंडपातून पळून गेल्याची अजब घटना कर्नाटकाच्या चन्नाकल मालुर येथे घडली. वर पक्षाकडची मंडळी पद्मावती कल्याण मंडप येथे वधूची वाट पाहत थांबलेले असताना वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. नवरी मुलीच्या अशा वागण्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नासाठी केलेला खर्च आणि दोन्ही कुटुंबांच्या इभ्रतीचा विचार करुन ज्येष्ठांनी या समस्येवर तोडगा काढला. त्यांनी लग्नासाठी पळून गेलेल्या वधूच्या चुलत बहिणीला तयार केले. 

पण या सर्व प्रकारामुळे हताश झालेला नवरदेव मुहूर्ताच्या काहीवेळ आधी अचानक गायब झाला.   त्यामुळे अखेर हे लग्न रद्द झाले. बंगळुरुपासून 46 किलोमीटर अंतरावर असलेल्या चन्नाकल मालुर येथे शनिवारी हे नाटय घडले. पद्मावती कल्याण मंडप हॉलमध्ये लग्नाआधीच्या विधींसाठी रिसेप्शन आयोजित केले होते. नवरदेवाकडची मंडळी पाच वाजताच हॉलवर पोहोचली. पण वधूपक्षाकडून सात वाजले तरी कोणीही आले नाही. 

संध्याकाळी सातपासून विधी सुरु होणार होते. मुलाकडच्यांनी वधूच्या आई-वडिलांशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन स्विचऑफ येत होता. काहीतरी वाईट घडलय असा त्यांना संशय आला. वरपक्षाने लगेच वधूचे गाव गाठले. त्यावेळी वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झालीय हे समजल्यानंतर वर पक्षाचा पारा चढला. दोन्ही बाजूंमध्ये बरीच वादावादी झाली. तणाव वाढला होता. 

अखेर ज्येष्ठांनी यावर तोडगा काढला आणि वधूच्या चुलत बहिणीला लग्नासाठी तयार केले. रविवारी सकाळी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली होती. दोन्हीकडचे कुटुंबिय सकाळी 8.15 ते 9 दरम्यानच्या मुहूर्ताची तयारी करत होते. पण त्याच दरम्यान वर मुलगा त्याच्या कक्षात नसल्याचे समजले. बरीच शोधाशोध करुनही वर मुलगा कुठेही सापडला नाही. अखेर दोन्हीकडच्यांनी हा विवाह मोडल्याचे जाहीर केले.