शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

'यूपी-बिहारवाले नोकऱ्या बळकावतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 10:35 IST

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. 

ठळक मुद्देउत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं.ज्यातील उद्योग-व्यवसायात 70 टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर त्यांनी स्वाक्षरी करून नियम लागूही केला आहे.स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून गार्मेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भोपाळ - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी सोमवारी (17 डिसेंबर) पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे. यानंतर राज्यातील उद्योग-व्यवसायात 70 टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर त्यांनी स्वाक्षरी करून नियम लागूही केला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे. 

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत कमलनाथ यांनी ही माहिती दिली. कमलनाथ यांनी 'जे उद्योग आणि कंपन्या भूमिपुत्रांना 70 टक्के रोजगार देतील, त्यांनाच राज्यात गुंतवणुकीसाठीच्या सवलती मिळतील', असं सांगितलं. तसेच 'उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यातून लोक येतात, स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. त्यामुळेच मी या नव्या नियमाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे', असंही कमलनाथ म्हणाले. मध्य प्रदेशात चार गार्मेंट पार्क सुरू करण्याची घोषणाही केली. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून गार्मेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गार्मेंट पार्कमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देणाऱ्या उद्योगांनाच प्रमोट केलं जाईल, असंही कमलनाथ यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील फाईलवर स्वाक्षरी केली. कमलनाथ यांच्या निर्णयाचा लाभ 2 लाखांपर्यंतचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मुख्य सचिव बसंत प्रताप सिंग यांनी अर्थ आणि कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली.

सध्या राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर 56,377 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातील जवळपास 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात गेले आहे. सोमवारी दुपारी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जांबुरी मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. कमलनाथ काँग्रेसचे 18वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारjobनोकरी