शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'यूपी-बिहारवाले नोकऱ्या बळकावतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 10:35 IST

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. 

ठळक मुद्देउत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं.ज्यातील उद्योग-व्यवसायात 70 टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर त्यांनी स्वाक्षरी करून नियम लागूही केला आहे.स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून गार्मेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भोपाळ - मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी सोमवारी (17 डिसेंबर) पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे. यानंतर राज्यातील उद्योग-व्यवसायात 70 टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर त्यांनी स्वाक्षरी करून नियम लागूही केला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे. 

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत कमलनाथ यांनी ही माहिती दिली. कमलनाथ यांनी 'जे उद्योग आणि कंपन्या भूमिपुत्रांना 70 टक्के रोजगार देतील, त्यांनाच राज्यात गुंतवणुकीसाठीच्या सवलती मिळतील', असं सांगितलं. तसेच 'उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यातून लोक येतात, स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. त्यामुळेच मी या नव्या नियमाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे', असंही कमलनाथ म्हणाले. मध्य प्रदेशात चार गार्मेंट पार्क सुरू करण्याची घोषणाही केली. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून गार्मेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गार्मेंट पार्कमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देणाऱ्या उद्योगांनाच प्रमोट केलं जाईल, असंही कमलनाथ यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेताच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील फाईलवर स्वाक्षरी केली. कमलनाथ यांच्या निर्णयाचा लाभ 2 लाखांपर्यंतचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. मुख्य सचिव बसंत प्रताप सिंग यांनी अर्थ आणि कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या फाईलवर स्वाक्षरी केली.

सध्या राज्यातील 41 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर 56,377 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातील जवळपास 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात गेले आहे. सोमवारी दुपारी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जांबुरी मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. कमलनाथ काँग्रेसचे 18वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर अवघ्या तासाभरात कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारjobनोकरी