शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 17:59 IST

चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले.

ठळक मुद्देभारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला.लष्कराने 2 तास या पुलावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. या पुलामुळे आता भारतीय जवानांना LACपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष सीमा रेषेवर (LAC) चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीनंतरही भारतीय लष्कर ठामपणे सीमेवर उभे आहे. या झटापटीनंतर सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झालेला असतानाही लष्कराच्या एका युनिटने गलवान खोऱ्यात एका पुलाचे काम सुरूच ठेवले. सांगण्यात येते, की लष्कराच्या याच कामावरून गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीनंतर काही तासांतच भारतीय लष्कराच्या लढवय्या जवानांनी गलवान नदीवर पुलाचे काम पूर्ण केले आहे. लष्करातील अभियंत्यांना हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

60 मीटर लांब आहे पूल -चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. या पुलामुळे आता भारतीय जवानांना LACपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, लगेचच मंगळवारी सकाळी लष्कराच्या कारू बेस्ड डिव्हिजनने, कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पुलाचे काम वेगात करा, असा संदेश अभियंता डिव्हिजनला पाठवला होता. 'बेली ब्रिज' अर्थात हा एक प्रकारचा पोर्टेबल पूल आहे. यामुळे लष्कराच्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहज पणे ये-जा करणे सोपे येईल.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार सोमवारी रात्री झालेल्या घटनेसारख्याच घटा पुन्हा होऊ शकतात, अशी शंका असल्याने स्थानीक कमांडर्सनी हा पूल लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. जेने करून भारतीय सैन्याला मदत होईल. या पुलापासून घटनास्थळ केवळ काही किलो मीटर अंतरावर आहे.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

भारत चीन वाद सुरू असतानाच पुलाचे काम करत असलेल्या अभियंत्यांना संरक्षण देण्यासाठी इंफन्ट्री युनिटला निर्देश देण्यात आले होते. अशा प्रकारे लष्कराच्या अभियंत्यांनी रक्तही गोठेल, एवढ्या थंडीतसुद्धा मंगळवारी आणि बुधवारी रात्रीही आपले काम सुरूच ठेवले आणि पुलाचे काम पूर्ण केले. 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndian Armyभारतीय जवान