शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

माघार नाही...; रक्त गोठवणारी थंडी अन् सीमेवरील तणावातही जवानांनी गलवान नदीवर तयार केला पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 17:59 IST

चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले.

ठळक मुद्देभारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला.लष्कराने 2 तास या पुलावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. या पुलामुळे आता भारतीय जवानांना LACपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष सीमा रेषेवर (LAC) चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीनंतरही भारतीय लष्कर ठामपणे सीमेवर उभे आहे. या झटापटीनंतर सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झालेला असतानाही लष्कराच्या एका युनिटने गलवान खोऱ्यात एका पुलाचे काम सुरूच ठेवले. सांगण्यात येते, की लष्कराच्या याच कामावरून गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, 15 जूनला झालेल्या हिंसक झटापटीनंतर काही तासांतच भारतीय लष्कराच्या लढवय्या जवानांनी गलवान नदीवर पुलाचे काम पूर्ण केले आहे. लष्करातील अभियंत्यांना हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

60 मीटर लांब आहे पूल -चीनबरोबर जबरदस्त तणाव असतानाच, भारतीय लष्कराच्या वीर जवानांनी 60 मीटर लांब असलेला हा पूल गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केला. एवढेच नाही, तर लष्कराने 2 तास त्यावर वाहने चालवून त्याचे परीक्षणही केले. या पुलामुळे आता भारतीय जवानांना LACपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, लगेचच मंगळवारी सकाळी लष्कराच्या कारू बेस्ड डिव्हिजनने, कुठल्याही प्रकारचा विलंब न करता पुलाचे काम वेगात करा, असा संदेश अभियंता डिव्हिजनला पाठवला होता. 'बेली ब्रिज' अर्थात हा एक प्रकारचा पोर्टेबल पूल आहे. यामुळे लष्कराच्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहज पणे ये-जा करणे सोपे येईल.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार सोमवारी रात्री झालेल्या घटनेसारख्याच घटा पुन्हा होऊ शकतात, अशी शंका असल्याने स्थानीक कमांडर्सनी हा पूल लवकरात लवकर तयार करण्याचे निर्देश दिले होते. जेने करून भारतीय सैन्याला मदत होईल. या पुलापासून घटनास्थळ केवळ काही किलो मीटर अंतरावर आहे.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

भारत चीन वाद सुरू असतानाच पुलाचे काम करत असलेल्या अभियंत्यांना संरक्षण देण्यासाठी इंफन्ट्री युनिटला निर्देश देण्यात आले होते. अशा प्रकारे लष्कराच्या अभियंत्यांनी रक्तही गोठेल, एवढ्या थंडीतसुद्धा मंगळवारी आणि बुधवारी रात्रीही आपले काम सुरूच ठेवले आणि पुलाचे काम पूर्ण केले. 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndian Armyभारतीय जवान