शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अखेर गुज्जर आंदोलन मागे

By admin | Updated: May 29, 2015 01:11 IST

सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षणासाठी गेल्या आठ दिवसांपासून राजस्थानात सुरू असलेले गुज्जर समुदायाचे आंदोलन अखेर बुधवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले.

जयपूर/ नवी दिल्ली : सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षणासाठी गेल्या आठ दिवसांपासून राजस्थानात सुरू असलेले गुज्जर समुदायाचे आंदोलन अखेर बुधवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले. दरम्यान, गुज्जर आंदोलनासोबत निपटण्यासाठी केंद्र सरकारकडून निमलष्करी दलाचे ४५०० जवान राजस्थानकडे पाठवण्यात आले आहेत. सरकारी नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात विधानसभेत विधेयक सादर करण्याचे राजस्थान सरकारने आश्वासन दिल्यानंतर गुज्जर समाजाच्या शिष्टमंडळाने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. राजस्थान गुज्जर आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक कर्नल किरोडीसिंह बैंसला यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रीमंडळाच्या तीन सदस्यीय उप समितीशी यासंदर्भात बातचीत केली. उभय पक्षांत चर्चेच्या तब्बल पाच फेऱ्या झाल्या.तत्पुर्वी, गुज्जर आंदोलकांनी अडवून धरलेले रस्ते व रेल्वेमार्ग तात्काळ मोकळे करा, असे निर्देश राजस्थान उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही गुरुवारी आठव्या दिवशीही दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग आणि जयपूर-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प राहिली. सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा मागणीसाठी सरकारवर दबाव टाकण्याच्या इराद्याने गुज्जर आंदोलकांनी हे मार्ग रोखून धरले आहेत. दरम्यान गुज्जर आरक्षण संघर्ष समिती व राज्य सरकार यांच्या चर्चेची पाचवी फेरी सुरू झाली आहे. ही चर्चा निर्णायक टप्प्यात असल्याचे संकेत गुज्जर आंदोलकांनी दिले आहेत.मुख्य सचिवांना फटकारले : गुज्जर आंदोलकांनी लोकांच्या अडचणी वाढल्या असूनही आत्तापर्यंत एकाही आंदोलकास अटक केली गेली नाही, यावर नेमके बोट ठेवत राजस्थान उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांचे चांगलेच कान टोचले. तुम्ही प्रशासन आणि कायदा व्यवस्थेचे प्रमुख आहात. राज्य सरकार व गुज्जर आंदोलकांत चर्चा सुरू असताना तुमच्यावर केवळ मूकदर्शक बनून राहण्याचे बंधन नाही. रेल्वे व रस्ते त्वरित मोकळे करा, असे न्यायालयाने या द्वयींना बजावले.