शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

‘खून’ केलेल्या पत्नीला त्याने ७ वर्षांनी शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 6:10 AM

गेल्या रविवारी अखेर अभयला इतिश्री सापडली. सोमवारी तिला न्यायालयात उभे केले गेले. तिची जबानी नोंदवून घेतल्यावर खून खटल्यातून अभयला निर्दोष मुक्त करण्यात आले!

केंद्रपाडा (ओदिशा) : पतकुरा गावातील अभय सुतार याच्यावर पत्नी इतिश्री हिचा खून केल्याबद्दल खटला दाखल केला गेला. सात वर्षांपूर्वी महिनाभर तुरुंगात राहिल्यावर त्याची जामिनावर सुटका झाली. तेव्हापासून त्याने ‘खून’ झालेल्या पत्नीला शोधून काढण्याचा ध्यास घेतला होता. गेल्या रविवारी अखेर अभयला इतिश्री सापडली. सोमवारी तिला न्यायालयात उभे केले गेले. तिची जबानी नोंदवून घेतल्यावर खून खटल्यातून अभयला निर्दोष मुक्त करण्यात आले!चौलिया गावातील अभयचा जवळच्याच समागोला गावातील इतिश्री हिच्याशी विवाह झाला. जेमतेम दोन महिने सासरी राहिल्यावर इतिश्री अचानक घरातून निघून गेली. थोडे दिवस शोध करून अभयने ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविली. दुसरीकडे इतिश्रीच्या वडिलांनी सुरुवातीला तिचा सासरी छळ होत असल्याची व नंतर अभयने तिचा खून करून मृतदेह कुठेतरी टाकून दिल्याची फिर्याद नोंदविली. याच फिर्यादीवरून अभयवर खुनाचा खटला दाखल झाला.अखेर पुरी जिल्ह्याच्या पिपली गावात अभयला इतिश्री सापडली आणि सात वर्षांचा त्याचा संशय खरा ठरला. इतिश्री राजीव लोचन मोहराना या तिच्या प्रियकरासोबत होती.इतिश्रीने न्यायालयात दिलेल्या जबानीने तिच्या सात वर्षे गायब होण्याचा उलगडा झाला. अभयशी लग्न होण्याआधीपासून इतिश्री व राजीव लोचन यांचे प्रेमसंबंध होते; पण घरच्यांनी तिचे अभयशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. एक दिवस संधी साधून ती सासरच्या घरातून रात्री गुपचूप बाहेर पडली. राजीव लोचनशी तिने पळून जाऊन लग्न केले. दोघे सात वर्षे गुजरातमध्ये राहिले. या दरम्यान त्यांना दोन मुलेही झाली. आता सर्व सामसूम झाले असेल, असे समजून दोघेही मुलांना घेऊन पुन्हा ओदिशात आले व पिपली गावात राहू लागले. राजीव लोचन भुवनेश्वरमध्ये रिक्षा चालवून कुटुंबाची उपजीविका चालवितो. (वृत्तसंस्था)>निर्दोष ठरल्याचे समाधानअभय म्हणतो, माझा इतिश्रीवर राग नाही. तिने मला आधी सांगितले असते तर मी तिच्याशी लग्न केलेही नसते. इतिश्रीचा खून झालेला नाही, या माझ्या सांगण्यावर कोणी विश्वासही ठेवायला तयार नव्हते.शेवटी जामिनावर सुटून बाहेर आल्यावर मीच तिला शोधण्याचे ठरविले. ती सापडली आणि मी निर्दोष ठरलो, याचेच मला समाधान आहे.