शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिला आणि पुरुषामध्ये अफेअर, वादानंतर प्रकरण कोर्टात, न्यायमूर्तींनी दिला असा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 22:27 IST

Court News: मध्य प्रदेश हायकोर्टाने एक विवाहित महिला आणि पुरुषामध्ये सुरू असलेल्या प्रेमसंबंधांनंतर झालेल्या वादाच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

मध्य प्रदेश हायकोर्टाने एक विवाहित महिला आणि पुरुषामध्ये सुरू असलेल्या प्रेमसंबंधांनंतर झालेल्या वादाच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.  कोर्टाने सांगितले की, कुठलीही विवाहित महिला विवाहाचं आश्वासन देऊन आपल्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले गेले, असा दावा करू शकत नाही, हा निर्णय वीरेंद्र यादव विरुद्ध मध्य प्रदेश सरकार या खटल्यात सुनावला आहे.

न्यायमूर्ती मनिंदर एस. भट्टी यांनी एका व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेली बलात्काराचा आरोप करणारी याचिका फेटाळून लावताना हा निकाल दिला. हा खटला एका विवाहित महिलेने दाखल केला होता. कोर्टाने सर्वोच्च न्यायालय आणि इतर उच्च न्यायालयांच्या निकालांचा हवाला देत सांगितले की, जेव्हा कुठलीही महिला आधीपासून विवाहित असते, तेव्हा विवाहाचं खोटं आश्वासन देऊन तिच्याकडून घेण्यात आलेल्या सहमतीच्या दाव्याला ग्राह्य धरता येणार नाही.

या प्रकरणातील आरोपीही विवाहित होता, तसेच त्याने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली बलात्काराची याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली होती. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिला लग्नाचं खोटं आश्वासन देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. तक्रारकर्ती महिला ही विवाहित होती आणि तिला दोन मुलेही होती. तिने आरोप केला की, आरोपी तिच्या शेजारी राहत होता. तसेच तीन महिन्यांपासून त्यांच्यात मैत्री झालेली होती. तिने पुढे सांगितले की, आरोपीने त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच या आश्वासनाच्या आधारावरच ती त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास तयार झाली होती. नंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला आणि मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत नाही, असे सांगितले. 

दरम्यान, सदर महिला आणि आरोपीमध्ये तीन महिन्यांपर्यंत संबंध होते, असे कोर्टाच्या निदर्शनास आले. कोर्टाने सांगितले की, जेव्हा महिलेचा पती घराबाहेर जायचा तेव्हा आरोपी तिच्या घरी यायचा आणि त्यांच्यामध्ये शरीरसंबंध प्रस्थापित व्हायचे. त्यामुळे महिलेने अजाणतेपणी शरीरसंबंधांना परवानगी दिली, असं म्हणता येत नाही, असेही कोर्टाने सुनावले. तसेच आरोपीने महिलेवर लग्नासाठी दबाव आणला होता किंवा तिला कुठल्या प्रकारे भाग पाडलं होतं, असं एफआयआरमधून दिसत नाही. आरोपीने खोटं आश्वासन देऊन महिलेशी संबंध प्रस्थापित केले, असे सिद्ध करणारा कुठलाही धागा एफआयआरमधून सापडला नाही. अशा परिस्थितीत एफआयआर त्वरित रद्द केली पाहिजे. तसेच आरोपांचं परीक्षण केलं असता कुठलाही गुन्हा घडला नसल्याचं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं.  

टॅग्स :Courtन्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेशFamilyपरिवार