शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

है तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:23 IST

जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहेसीमारेषेवरील तणाव लक्षात घेता, वायू दलास अलर्ट राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

मुंबई - भारताने कलम 370 हटविल्याच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. तर, इम्रान खान यांच्या पोकळ धमक्यांना भारताने कसलिही भीक घातली नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार सैरभैर झालं आहे. आम्ही युद्धजन्य स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे उद्गार पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी म्हटले होते. त्यांच्यासमवेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी हेही होते. त्याला राजनाथसिंह यांनी त्याच भाषेत उत्तर दिले होते. त्यानंतर, आता एअर मार्शल धनोआ यांनीही सज्ज असल्याचं म्हटलंय. 

जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. इम्रान खान सरकारने पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाक पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी इम्रान खान यांनी हा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे. अलिकडेच पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र संघात फटकारण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानला चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाचे प्रमुख एअर मार्शल बीएस. धनोआ यांनी वायू दलाला सतर्क आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. 

सीमारेषेवरील तणाव लक्षात घेता, वायू दलास अलर्ट राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. भारतीय वायू सेना नेहमीच तयारीत असते. शत्रूराष्ट्राचा हवाई हल्ला परतविण्यासाठी आम्ही नेहमी सज्ज असून आपली वायू सेना तत्पर आहे. केवळ युद्धासाठीच नाही, तर इतर वेळीही वायू दलाचे विमान सज्ज असते, असे धनोआ यांनी सांगितले. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना धनोआ यांनी वायू दल सतर्क आणि सज्ज असल्याचं म्हटलंय. दरम्यान, गेल्याच आठवड्यात लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही भारतीय सैन्य आपल्या पोजीशनमध्ये असून सध्या सीमारेषेवर शांत वातावरण असल्याचं म्हटलं होतं. 

 

टॅग्स :airforceहवाईदलBorderसीमारेषाIndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानArticle 370कलम 370