शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

है तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:23 IST

जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहेसीमारेषेवरील तणाव लक्षात घेता, वायू दलास अलर्ट राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

मुंबई - भारताने कलम 370 हटविल्याच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. तर, इम्रान खान यांच्या पोकळ धमक्यांना भारताने कसलिही भीक घातली नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकार सैरभैर झालं आहे. आम्ही युद्धजन्य स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहोत, असे उद्गार पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी म्हटले होते. त्यांच्यासमवेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी हेही होते. त्याला राजनाथसिंह यांनी त्याच भाषेत उत्तर दिले होते. त्यानंतर, आता एअर मार्शल धनोआ यांनीही सज्ज असल्याचं म्हटलंय. 

जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. इम्रान खान सरकारने पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाक पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी इम्रान खान यांनी हा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे. अलिकडेच पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र संघात फटकारण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानला चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय वायू दलाचे प्रमुख एअर मार्शल बीएस. धनोआ यांनी वायू दलाला सतर्क आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. 

सीमारेषेवरील तणाव लक्षात घेता, वायू दलास अलर्ट राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. भारतीय वायू सेना नेहमीच तयारीत असते. शत्रूराष्ट्राचा हवाई हल्ला परतविण्यासाठी आम्ही नेहमी सज्ज असून आपली वायू सेना तत्पर आहे. केवळ युद्धासाठीच नाही, तर इतर वेळीही वायू दलाचे विमान सज्ज असते, असे धनोआ यांनी सांगितले. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना धनोआ यांनी वायू दल सतर्क आणि सज्ज असल्याचं म्हटलंय. दरम्यान, गेल्याच आठवड्यात लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीही भारतीय सैन्य आपल्या पोजीशनमध्ये असून सध्या सीमारेषेवर शांत वातावरण असल्याचं म्हटलं होतं. 

 

टॅग्स :airforceहवाईदलBorderसीमारेषाIndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानArticle 370कलम 370