शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अडवाणी, मुरली मनोहर जोशींसह १३ ज्येष्ठांना भाजपाची उमेदवारी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 05:35 IST

लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ भाजपाने पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनाही उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आतापर्यंत उमेदवारी न दिलेल्या वरिष्ठ नेत्यांची संख्या १३ झाली आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ भाजपाने पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनाही उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आतापर्यंत उमेदवारी न दिलेल्या वरिष्ठ नेत्यांची संख्या १३ झाली आहे. अद्याप तिघा वरिष्ठ नेत्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय व्हायचा आहे.शांताकुमार, करिया मुंडा, बी. सी. खंडुरी, भगतसिंह कोशियारी, बिजया चक्रवर्ती, हुकूमदेव नारायण यादव, बन्सीलाल महन्तो, राम तहल चौधरी यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने आधीच घेतला आहे. एका नेत्याने पक्षच सोडला आहे.भाजपाने ७५ वर्षे ओलांडलेल्या नेत्यांना उमेदवारी न देण्याचे धोरण आखले आहे. मात्र, इंदूरमधून निवडून येणाऱ्या लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन (वय ७६) यांचा अपवाद होण्याची चिन्हे आहेत. आता प्रभातसिंह चौहान, लीलाधरभाई वाघेला यांच्याबाबत निर्णय व्हायचा आहे. रामपूरमधून निवडून येणारे डॉ. नेपालसिेंह यांना उमेदवारी न देता, भाजपात मंगळवारी प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री जया प्रदा यांना लगेचच तिकीट दिले आहे.वरिष्ठांच्या उमेदवारीबाबत भाजपाने सरचिटणीस राम लाल यांच्याकडे जबाबदारी सोपविली होती. ते जवळपास प्रत्येक वरिष्ठ नेत्याशी प्रत्यक्ष वा फोनवर बोलले. त्यांनी त्या नेत्यांनाच, आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही आहोत, असे निवेदन करण्यास सांगितले. अडवाणी व डॉ. मुरली मनोहर जोशी वगळता सर्वांनीच त्यांचे म्हणणे मान्य करून तसे निवेदनही दिले. नजमा हेपतुल्ला यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण होताच स्वत:हून पक्षाला तसे कळविले होते. त्याचा त्यांना फायदा झाला आणि त्या राज्यपाल झाल्या. अडवाणी यांनी उमेदवारी न मिळाल्यापासून अवाक्षरही काढलेले नाही. मात्र, ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी तर खूपच नाराज झाले. पक्षाध्यक्षांनी वरिष्ठ नेत्यांविषयी आदर बाळगून हे करता आले असते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी कानपूरच्या मतदारांना पत्र लिहिले आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस रामलाल यांनी मला लोकसभेची निवडणूक लढवू नका, असे सांगितल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मनेका गांधी सुलतानपूरमधून; जया प्रदा रामपूरच्या उमेदवारभाजपाने आज काही उमेदवारांची नावे जाहीर केली असून, आतापर्यंत पिलीभीतमधून निवडून येणाऱ्या मनेका गांधी यांना त्यांच्या विनंतीनुसार सुलतानपूरची उमेदवारी दिली आहे. त्यांनी पिलीभीतसाठी वरुण गांधींचे नाव सुचविले होते.तेही पक्षाने मान्य केले आहे. पक्षात आज दाखल झालेल्या जया प्रदा यांना लगेचच रामपूरची उमेदवारी मिळाली, तर या आधी काँग्रेसमधून आलेल्या रिटा बहुगुणा यांना अलाहाबादमधून, जगदंबिका पाल यांना डोमरियागंज व केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना चंदोलीमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक