शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

विवाहसंस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी व्यभिचार हा गुन्हाच समजला पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 18:05 IST

भारतीय दंड संहितेच्या कलम 497 नुसार जो पुरुष आपली पत्नी नसणाऱ्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवतो तो कारवाईस पात्र आहे.

नवी दिल्ली- भारतीय संस्कृतीमध्ये विवाहसंस्थेला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे या संस्थेचे पावित्र्य कायम राखण्यासाठी व्यभिचाराला गुन्हा म्हणूनच ठेवणे आवश्यक आहे असे मत केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज मांडले गेले.भारतीय दंड संहितेच्या कलम 497 नुसार जो पुरुष आपली पत्नी नसणाऱ्या स्त्रीशी शरीरसंबंध ठेवतो तो कारवाईस पात्र आहे. हा कायदा रद्द करणे म्हणजे भारतीय संस्कृतीत परमोच्च स्थानावर असणाऱ्या विवाहसंस्थेचे पावित्र्य भंग करणे असे होईल असे मत केंद्र सरकारतर्फे मांडले गेले. हा कायदा भारतीय विवाहसंस्थेच्या पावित्र्याला जपण्यासाठी तयार केला गेला होता. जर हा कायदा रद्द झाला तर विवाहबंध कमकुवत होतील असे शपथपत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले.केरळमधील जोसेफ शिन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर केंद्र सरकार आपली बाजू मांडत होते. जोसेफ यांनी व्यभिचारामध्ये केवळ पुरुषालाच का दोषी धरले जाते, त्याबरोबर संबंधित महिलेलाही दोषी ठरवण्यात यावे असा प्रश्न विचारणारी याचिका दाखल केली आहे. यावर सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्यायाधीश ए.एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत