शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

मनमिळावू स्वभावाचे अभ्यासू राजकारणी प्रणवदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 04:04 IST

उत्तम वक्ते, लेखक अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून केंद्र सरकारने त्यांचा उचित सन्मान केला आहे.

नवी दिल्ली- पाच दशके सक्रिय राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या पदांवर मोलाची कामगिरी बजावलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते, अभिजात बंगाली संस्कृतीचे सच्चे प्रतिनिधी, उत्तम वक्ते, लेखक अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून केंद्र सरकारने त्यांचा उचित सन्मान केला आहे.त्यांचा जन्म बंगालमधील मिराती गावी ११ डिसेंबर १९३५ रोजी झाला. प्रणव मुखर्जी यांना राजकारणात मोठी संधी मिळाली ती १९६९ साली. त्यांच्यातले नेतृत्वगुण ओळखून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर त्यांना राज्यसभेत निवडून आणले. त्यानंतर ते लवकरच इंदिरा गांधींच्या निकटच्या वर्तुळात सामील झाले. १९८२ ते १९८४ या कालावधीत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपद भूषविले. १९८० ते १९८५ या कालावधीत त्यांनी राज्यसभेत काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून केलेली कामगिरी महत्वाची ठरली.इंदिरा गांधी यांच्या १९८४ साली हत्या झाल्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. मात्र त्यांच्याशी सूत न जमल्याने प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसचा त्याग करून स्वत:चा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. मात्र त्या पक्षाला विशेष जोर न धरता आल्याने अखेर ते १९८९ पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.सन १९९१ साली राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला विजय मिळून पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांच्या काळात प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द पुन्हा बहरली. राव यांनी त्यांना १९९१ साली नियोजन आयोगाच्या प्रमुखपदी व १९९५ साली परराष्ट्रमंत्री नेमले. १९९८ साली सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे म्हणून ज्यांनी भगीरथ प्रयत्न केले त्यात प्रणव मुखर्जी आघाडीवर होते.२००४ साली सार्वत्रिक निवडणुकीत ते निवडून पहिल्यांदा लोकसभेत पोहचले. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मुखर्जी यांनी संरक्षण, वित्त, परराष्ट्र व्यवहार या खात्यांचे मंत्रीपद भुषविले. २०१२ साली त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांचा पराभव केला.सन २०१७ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा उभे राहाण्याचा त्यांना आग्रह झाला होता परंतु प्रकृती नीट नसल्याचे व वयोमानाचे कारण देऊन त्यांनी राजकारणातून संपूर्ण निवृत्ती पत्करली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे ते पहिले माजी राष्ट्रपती ठरले. प्रणव मुखर्जी यांनी ‘इमर्जिंग डायमेन्शन्स आॅफ इंडियन इकॉनॉमी’, ‘दी टर्ब्ल्युलन्ट इयर्स १९८०-१९९६’ आदी काही उत्तम पुस्तकेही लिहिली आहेत.

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी