शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ न देता मेडिकलला प्रवेश; तामिळनाडूचा धक्कादायक निर्णय, १२ वीचे गुण धरणार ग्राह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 05:08 IST

अन्य राज्यांकडे लक्ष्य

चेन्नई : नीट परीक्षेच्या १९ तास आधी  एका विद्याथ्र्याने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. केंद्राची नीट परीक्षा नकोच अशीच मागणी विद्यार्थी, पालक आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केली. त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले गेले आणि संमतही झाले. त्या राज्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाठी केंद्रीय नीटची गरज नाही, असाच या कायद्याचा अर्थ आहे.

आता तामिळनाडूच्या धर्तीवर अन्य राज्यांतही अशीच मागणी होऊ  शकेल आणि कदाचित तेथील सरकारनेही अशीच विधेयके मांडू शकतील. त्यामुळे केंद्रीय परीक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. सत्ताधारी द्रमुकने विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीटच्या (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) विरोधात विधेयक सादर केले. या विधेयकेद्वारे राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतून स्थायी स्वरूपात सूट मिळण्याची मागणी केली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन म्हणाले की, या विधेयकाद्वारे  सरकारी व खासगी संस्थांमध्ये वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.

उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींवर विचार करून, सामाजिक न्याय, समानतेचे तसेच प्रभावित मुलांचे रक्षण करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले आहे. ग्रामीण भागांत आरोग्यसेवा मजबूत करणो हाही विधेयकाला उदेश आहे. त्यामुळे तामिळनाडूतील विद्यार्थ्यांना रावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश मिळणो शक्य होईल. राज्यातील विद्यार्थ्यांच्या हिताचे हे विधेयक एकमताने संमत व्हावे, असे आवाहन मी सर्व आमदारांना करतो, असे आवाहन स्टालिन यांनी केले होते.

...तर विद्यार्थ्याचे प्राण वाचले असते

- अण्णा द्रमुकचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी म्हणाले की, राज्यातील विद्यार्थी व पालक नीट परीक्षांबाबत पूर्णपणे भ्रमात आहेत. 

- द्रमुक सरकारने नीटबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळेच परीक्षेच्या काही तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. 

- त्यानंतरच स्टॅलिन सरकारने नीट परीक्षा नको, असे विधेयक आणले. सरकारने ही भूमिका आधी घेतली असती, तर आत्महत्या करणाऱ्या त्या विद्यार्थ्याचे प्राण वाचले असते.

संमत झालेल्या विधेयकामुळे सरकारी व खासगी शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा बारावी परीक्षेतील गुणांच्या आधारे मिळू शकतील. - एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री   

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूEducationशिक्षण