शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 10:46 IST

Anil Vij : हरयाणात विधानसभा निवडणुकीत अनिल विज यांनी अंबाला कँट मतदारसंघातून केवळ ७२७७ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती.

नुकत्याच हरयाणात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत प्रशासनाने आपला पराभव करण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याचे षडयंत्र रचले, असा दावा हरयाणात सरकारमधील कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी केला आहे. एका आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनिल विज यांनी हरयाणात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, "प्रशासनाने अनिल विज यांना हरवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. प्रशासनाला माझा पराभव करायचा होता. प्रशासनाने हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला, हा तपासाचा विषय आहे. मी थेट आरोप करत नाहीये... रक्तपात घडवण्याचा प्रयत्न झाला. अनिल विज यांचा जीव गेला म्हणजे निवडणूक बरबाद होईल."

दरम्यान, हरयाणात विधानसभा निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राहिलेले ७१ वर्षीय अनिल विज यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत अंबाला कँट मतदारसंघातून अनिज वीज हे ७२७७ मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसने अंबाला कँट मतदारसंघातून कुमारी शैलजा यांचे निकटवर्तीय परविंदर सिंग परीला उमेदवारी दिली होती.

अनिल विज यांनी केला होता मुख्यमंत्रीपदावर दावा हरयाणात भाजपने निवडणूक जिंकण्यापूर्वीच अनिल विज यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि पक्षाला हवा तो मुख्यमंत्री होईल. पक्षाला माझी इच्छा असेल तर पुढची बैठक तुमच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होईल. मी पक्षात सर्वांपेक्षा वरिष्ठ आहे, असे ते म्हणाले होते.

बहुमताने भाजप सरकार स्थापनदरम्यान, हरयाणात गेली १० वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने यावेळी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत.याशिवाय, दोन जागा इंडियन नॅशनल लोकदलाच्या खात्यात गेल्या आहेत.

टॅग्स :Anil Vijअनिल विजHaryanaहरयाणाBJPभाजपा