कांद्याच्या खरेदी-विक्रीवर प्रशासनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30
फोटो-कांदा..

कांद्याच्या खरेदी-विक्रीवर प्रशासनाची नजर
फ टो-कांदा..सोलापूर: राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच नव्याने कांदा लावगडही अत्यल्प झाल्याने कांद्याचे दर भलतेच वाढले आहेत. याचे परिणाम शासन पातळीवर झाले असल्याने बाजार समितीत होणार्या कांद्याच्या आवक-जावकची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतली जात आहे.मागील वर्षभर शेतीमालाचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दूध, ऊस व अन्य कोणत्याही उत्पादित मालापोटी शेतकर्यांना चांगला दर मिळाला नाही. कांद्याचेही असेच झाले आहे. वर्षभर प्रति क्विंटल दोन हजारांपेक्षा कमी दराने शेतकर्यांकडून कांद्याची खरेदी झाली आहे. व्यापार्यांनी शेतकर्यांकडून खरेदी केलेला कांदा आता बाजारात येऊ लागला आहे. बोटावर मोजण्याइतक्या शेतकर्यांकडेच आज कांदा आहे. कांद्याचे दर वाढल्याने कांद्याची होणारी आवक व खरेदीची माहिती दररोज जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून घेतली जात आहे. मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 38 ट्रक कांदा आला होता. सोलापूर, अहमदनगर, पुणेसह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून कांद्याची आवक झाली. दररोज याच पटीत कांद्याची आवक होते. लिलावाद्वारे कांद्याची विक्री, स्थानिक बाजारात विक्री होणार्या कांद्याचा दर यात मोठी तफावत राहू नये, यासाठी प्रशासनाचे प्रय} असल्याचे सांगण्यात आले.कोटकांद्याची आवक फारच कमी आहे. जिल्?ातील शेतकर्यांकडे तर कांदाच नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा कांदा स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी गेला पाहिजे, साठेबाजी होऊ नये यासाठी कांद्याची माहिती घेतली जात आहे.बिभीषण लावंडजिल्हा उपनिबंधक