शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Adhir Ranjan Chowdhury: "आमच्याकडे 700 आमदार, तृणमूलचं काय?", ममता बॅनर्जींच्या टीकेवर काँग्रेस नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 12:41 IST

Adhir Ranjan Chowdhury on Mamata Banerjee: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी पलटवार केला आहे.

नवी दिल्ली: 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) लागला. त्या निकालात पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्ता राखली, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने(AAP) काँग्रेसचा(Congress) दारुण पराभव केला. त्यानंतर आता काँग्रेसवर जोरदार टीका होत आहे. संपूर्ण देशात फक्त दोन राज्यात काँग्रसचे सरकार आहे. काँग्रेसच्या या पराभवानंतर राजकारण चांगलेच तापले असून, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

'काँग्रेसने विश्वासार्हता गमावली'माध्यमांशी बोलताना ममतांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ''मला वाटते की, भाजपशी लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम करायला हवे. काँग्रेसने त्यांची विश्वासार्हता गमावली, त्यांच्यावर आता अवलंबून राहण्यात काहीही अर्थ नाही. काँग्रेसचा सर्वच ठिकाणी दारुण पराभव होत आहे, त्यांना जिंकण्यात काडीमात्र रस दिसत नाही'', अशी खोचक टीका ममतांनी केली होती. 

काँग्रेस नेत्याचा ममतांवर पलटवारममतांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी पलटवार केला. 'ममता बॅनर्जी भाजपच्या एजंट आहेत. संपूर्ण भारतभर काँग्रेसला मोठा पाठिंबा आहे. विरोधकांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते एकट्या काँग्रेसकडे आहेत. ममतांनी विसरू नये की, काँग्रेसमधूनच ममता आणि तृणमूलचा जन्म झाला आहे. आजही राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय राजकारणात तृणमूल काँग्रेसचे स्थान कुठे आहे?'' असा सवाल चौधरी यांनी केला.

'आमच्याकडे 700 आमदार'अधीर रंजन पुढे म्हणाले की, ''वेड्या लोकांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही. संपूर्ण भारतात काँग्रेसचे 700 आमदार आहेत. ममतांकडे आहेत का तिवढे आमदार? विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते काँग्रेसकडे आहेत. दीदींकडे आहे का? भाजपला खूश करण्यासाठी आणि त्यांचे एजंट म्हणून काम करण्यासाठी दीदी असे बोलत आहेत. तिकडे गोव्यामध्येही तृणमूलने भाजपसाठी काम केले. तृणमूल नसते, तर गोव्यात आज आमची सत्ता आली असते. त्यामुळे भाजपविरोधातील आघाडी काँग्रेसशिवाय होऊच शकत नाही'', असेही चौधरी म्हणाले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा