शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

Adhir Ranjan Chowdhury: "आमच्याकडे 700 आमदार, तृणमूलचं काय?", ममता बॅनर्जींच्या टीकेवर काँग्रेस नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 12:41 IST

Adhir Ranjan Chowdhury on Mamata Banerjee: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी पलटवार केला आहे.

नवी दिल्ली: 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Result) लागला. त्या निकालात पाचपैकी चार राज्यात भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्ता राखली, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने(AAP) काँग्रेसचा(Congress) दारुण पराभव केला. त्यानंतर आता काँग्रेसवर जोरदार टीका होत आहे. संपूर्ण देशात फक्त दोन राज्यात काँग्रसचे सरकार आहे. काँग्रेसच्या या पराभवानंतर राजकारण चांगलेच तापले असून, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

'काँग्रेसने विश्वासार्हता गमावली'माध्यमांशी बोलताना ममतांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ''मला वाटते की, भाजपशी लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम करायला हवे. काँग्रेसने त्यांची विश्वासार्हता गमावली, त्यांच्यावर आता अवलंबून राहण्यात काहीही अर्थ नाही. काँग्रेसचा सर्वच ठिकाणी दारुण पराभव होत आहे, त्यांना जिंकण्यात काडीमात्र रस दिसत नाही'', अशी खोचक टीका ममतांनी केली होती. 

काँग्रेस नेत्याचा ममतांवर पलटवारममतांच्या टीकेनंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी पलटवार केला. 'ममता बॅनर्जी भाजपच्या एजंट आहेत. संपूर्ण भारतभर काँग्रेसला मोठा पाठिंबा आहे. विरोधकांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते एकट्या काँग्रेसकडे आहेत. ममतांनी विसरू नये की, काँग्रेसमधूनच ममता आणि तृणमूलचा जन्म झाला आहे. आजही राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय राजकारणात तृणमूल काँग्रेसचे स्थान कुठे आहे?'' असा सवाल चौधरी यांनी केला.

'आमच्याकडे 700 आमदार'अधीर रंजन पुढे म्हणाले की, ''वेड्या लोकांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही. संपूर्ण भारतात काँग्रेसचे 700 आमदार आहेत. ममतांकडे आहेत का तिवढे आमदार? विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते काँग्रेसकडे आहेत. दीदींकडे आहे का? भाजपला खूश करण्यासाठी आणि त्यांचे एजंट म्हणून काम करण्यासाठी दीदी असे बोलत आहेत. तिकडे गोव्यामध्येही तृणमूलने भाजपसाठी काम केले. तृणमूल नसते, तर गोव्यात आज आमची सत्ता आली असते. त्यामुळे भाजपविरोधातील आघाडी काँग्रेसशिवाय होऊच शकत नाही'', असेही चौधरी म्हणाले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा