शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कोळसासाठा पुरेसा, वीजटंचाई नाही, केंद्र सरकारचा दावा, अमित शहा यांच्याकडे झाली तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 07:06 IST

Electricity crisis in india: कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाची टंचाई नाही, असे ठामपणे सांगितले.

नवी दिल्ली : कोळशाअभावी राज्यातील अनेक वीजनिर्मिती संच बंद पडल्याचे आणि अनेक राज्यांत वीजटंचाईची शक्यता असल्याचे वृत्त येताच राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोळसा मंत्री, ऊर्जामंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची सोमवारी घाईघाईने बैठक बोलावली. कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाची टंचाई नाही, असे ठामपणे सांगितले.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी कोळशाचा पुरवठा पुरेसा नसल्याच्या तक्रारी केंद्राकडे केल्या होत्या. वीज पुरवठा बंद झाला, तर उद्योगधंदे बंद होतील, असेही या राज्यांनी कळविले होते. त्याची केंद्राने लगेचच दखल घेतली. कोणत्याही राज्याला कोळसा कमी पडू देणार नाही आणि वीजटंचाईही भासू देणार नाही, असे दोघा मंत्र्यांनी अमित शहा यांच्याकडील बैठकीत स्पष्ट केले. 

५०० मेगावॅटचा संच आजपासून सुरू होणारमुंबई : राज्यात सरासरी दोन दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा असल्याचे महानिर्मितीचे म्हणणे आहे. उपलब्धतेत वाढ होऊन लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षाही आहे. त्यांच्या एकूण पाच बंद वीजनिर्मिती संचांपैकी भुसावळचा ५०० मेगावॅटचा संच मंगळवारपासून सुरू होईल. कोळसासाठ्यात ४ ऑक्टोबरपासून सुधारणा होऊ लागली आहे. सरासरी दररोज एक लाख मेट्रिक टन इतक्या कोळशाची आवक सुरू होती. त्यात आता वाढ होत आहे.

टॅग्स :electricityवीजIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारCoal Shortageकोळसा संकट