शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोळसासाठा पुरेसा, वीजटंचाई नाही, केंद्र सरकारचा दावा, अमित शहा यांच्याकडे झाली तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 07:06 IST

Electricity crisis in india: कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाची टंचाई नाही, असे ठामपणे सांगितले.

नवी दिल्ली : कोळशाअभावी राज्यातील अनेक वीजनिर्मिती संच बंद पडल्याचे आणि अनेक राज्यांत वीजटंचाईची शक्यता असल्याचे वृत्त येताच राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोळसा मंत्री, ऊर्जामंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची सोमवारी घाईघाईने बैठक बोलावली. कोळशाची टंचाई बिकट असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे चार दिवसांपूर्वी सांगणाऱ्या आर. के. सिंग यांनी आज मात्र कुठेही वीजटंचाई निर्माण होणार नाही, असा दावा केला. कोळसा मंत्री प्रल्हादभाई जोशी यांनीही देशात कोळशाची टंचाई नाही, असे ठामपणे सांगितले.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, आंध्र प्रदेश आदी राज्यांनी कोळशाचा पुरवठा पुरेसा नसल्याच्या तक्रारी केंद्राकडे केल्या होत्या. वीज पुरवठा बंद झाला, तर उद्योगधंदे बंद होतील, असेही या राज्यांनी कळविले होते. त्याची केंद्राने लगेचच दखल घेतली. कोणत्याही राज्याला कोळसा कमी पडू देणार नाही आणि वीजटंचाईही भासू देणार नाही, असे दोघा मंत्र्यांनी अमित शहा यांच्याकडील बैठकीत स्पष्ट केले. 

५०० मेगावॅटचा संच आजपासून सुरू होणारमुंबई : राज्यात सरासरी दोन दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा असल्याचे महानिर्मितीचे म्हणणे आहे. उपलब्धतेत वाढ होऊन लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षाही आहे. त्यांच्या एकूण पाच बंद वीजनिर्मिती संचांपैकी भुसावळचा ५०० मेगावॅटचा संच मंगळवारपासून सुरू होईल. कोळसासाठ्यात ४ ऑक्टोबरपासून सुधारणा होऊ लागली आहे. सरासरी दररोज एक लाख मेट्रिक टन इतक्या कोळशाची आवक सुरू होती. त्यात आता वाढ होत आहे.

टॅग्स :electricityवीजIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारCoal Shortageकोळसा संकट