शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अभिनेता संचारी 'विजय' यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 15:52 IST

विजय यांचे भाऊ सिद्धेश यांनी सांगितले की, विजय यांचा मेंदू काम करत नव्हता. त्यामुळे, आम्ही त्यांचे शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारी विजय हे स्वत: समाजाभिमूक होते, सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे.

ठळक मुद्देआम्ही त्यांचे शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारी विजय हे स्वत: समाजाभिमूक होते, सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे, त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले.

बंगळुरू - कन्नड चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध अभिनेते संचारी विजय यांची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री बंगळुरूजवळ विजय यांच्या गाडीला अपघात झाला होता, आज त्यांचे निधन झाले. अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांचे ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पार्थीव शरीर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

विजय यांचे भाऊ सिद्धेश यांनी सांगितले की, विजय यांचा मेंदू काम करत नव्हता. त्यामुळे, आम्ही त्यांचे शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारी विजय हे स्वत: समाजाभिमूक होते, सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे, त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. विजय यांच्या गाडीला शनिवारी रात्री 11.45 वाजता अपघात झाला. ते बाईकवर पाठीमागे बसले होते, पण पावसामुळे रस्ता ओला असल्याने त्यांची बाईक घसरली. त्यामध्ये, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर, त्यांची ब्रेन सर्जरीही करण्यात आली. पण, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, सन 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नानू अवनाल्ला अवालू' चित्रपटातील भूमिकेनंतर संचारी विजय प्रसिद्धीच्या झोतात आले. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. लॉकडाऊन काळात विजय यांनी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरविण्यासाठीही मदत केली होती. त्यामुळेच, सोशल मीडितूनही त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत असून चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

टॅग्स :Accidentअपघातkannad-acकन्नडKarnatakकर्नाटकBengaluruबेंगळूरcinemaसिनेमा