शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Bhima Koregaon: गौतम नवलखा यांची नजरकैदेतूनही सुटका, पुणे पोलिसांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 18:27 IST

भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नजरकैदेतूनही सुटका केल्याने पुणे पोलिसांना मोठा दणका बसला.

नवी दिल्ली: भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नजरकैदेतूनही सुटका केल्याने पुणे पोलिसांना मोठा दणका बसला.२८ आॅगस्ट रोजी दिल्लीत अटक केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी पुण्याला नेण्यासाठी राजधानीतील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडून त्यांचा ‘ट्रान्सिट रिमांड’ घेतला होता. लगेचच नवलखा यांनी केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने या रिमांडला अंतरिम स्थगिती देऊन नवलखा यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. पुढे नवलखा यांच्या पाच मित्रांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळेपर्यंत नवलखा महिनाभर नजरकैदेतच होते. मात्र दिल्ली उच्च न्यायालायच्या न्या. एस. मुरलीधर व न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर नवलखा यांची याचिका मंजूर करताना ‘ट्रान्सिट रिमांड’च रद्द केल्याने नजरकैदही संपुष्टात आली.

‘ट्रान्सिट रिमांड’ रद्द केला असला तरी त्याने कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यास पोलिसांना बाध येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तांत्रिकदृष्ट्या पोलिसांनी नवलखा यांना अटक केली. परंतु त्यांनी कोठडीत ठेवण्याची कोणताही वैध रिमांड आदेश नसल्याने पोलिसांना तपासासाठी नवलखा यांचा ताबा मिळणार नाही. त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा अटक करण्याचीही कायद्यात सोय नाही.वैध रिमांड आदेश नसताना नवलखा २४ तासांहून अधिक काळ स्थानबद्धतेत राहिले.त्याने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ५६ व ५७ चा उघडपणे भंग झाल्याने नवलखा यांना आणखी पुढे नजरकैदेतही ठेवले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.आरोपींच्या मित्रांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची नजरकैद आणखी चार आठवडे सुरु राहील, असे निदर्शनास आणत महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी नवलखा यांची नजरकैद आणखी निदान दोन दिवस तरी सुरु ठेववी, अशी विनंती केली. मात्र ती अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, आरोपींना खालच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी ही मुदत दिली गेली होती. पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वीच नवलखा यांनी आमच्याकडे ही याचिका केलेली असल्याने त्यांना ती लागू होत नाही.

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे करून भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी देण्याच्या आरोपांवरून विविध ठिकाणी धाडी टाकून पुणे पोलिसांनी नवलखा यांच्याखेरीज वरावरा राव (हैदराबाद), सुधा भारद्वाज (फरिदाबाद), अरुण फरेरा (ठाणे) व व्हर्नॉन गोन्साल्विस (मुंबई) यांना अटक केली होती. हे आरोपी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचेही सक्रिय कार्यकर्ते असल्याचे तपासातून उघड झाल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने हे पाचही आरोपी आत्तापर्यंत नजरकैदेतच राहिल्याने त्यांच्यापैकी एकाचाही ताबा पोलिसांना मिळालेला नाही.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारHigh Courtउच्च न्यायालय