शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

Bhima Koregaon: गौतम नवलखा यांची नजरकैदेतूनही सुटका, पुणे पोलिसांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 18:27 IST

भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नजरकैदेतूनही सुटका केल्याने पुणे पोलिसांना मोठा दणका बसला.

नवी दिल्ली: भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक केलेले मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांची दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नजरकैदेतूनही सुटका केल्याने पुणे पोलिसांना मोठा दणका बसला.२८ आॅगस्ट रोजी दिल्लीत अटक केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासासाठी पुण्याला नेण्यासाठी राजधानीतील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडून त्यांचा ‘ट्रान्सिट रिमांड’ घेतला होता. लगेचच नवलखा यांनी केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने या रिमांडला अंतरिम स्थगिती देऊन नवलखा यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. पुढे नवलखा यांच्या पाच मित्रांनी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळेपर्यंत नवलखा महिनाभर नजरकैदेतच होते. मात्र दिल्ली उच्च न्यायालायच्या न्या. एस. मुरलीधर व न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर नवलखा यांची याचिका मंजूर करताना ‘ट्रान्सिट रिमांड’च रद्द केल्याने नजरकैदही संपुष्टात आली.

‘ट्रान्सिट रिमांड’ रद्द केला असला तरी त्याने कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यास पोलिसांना बाध येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तांत्रिकदृष्ट्या पोलिसांनी नवलखा यांना अटक केली. परंतु त्यांनी कोठडीत ठेवण्याची कोणताही वैध रिमांड आदेश नसल्याने पोलिसांना तपासासाठी नवलखा यांचा ताबा मिळणार नाही. त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा अटक करण्याचीही कायद्यात सोय नाही.वैध रिमांड आदेश नसताना नवलखा २४ तासांहून अधिक काळ स्थानबद्धतेत राहिले.त्याने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ५६ व ५७ चा उघडपणे भंग झाल्याने नवलखा यांना आणखी पुढे नजरकैदेतही ठेवले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.आरोपींच्या मित्रांची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची नजरकैद आणखी चार आठवडे सुरु राहील, असे निदर्शनास आणत महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी नवलखा यांची नजरकैद आणखी निदान दोन दिवस तरी सुरु ठेववी, अशी विनंती केली. मात्र ती अमान्य करताना खंडपीठाने म्हटले की, आरोपींना खालच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी ही मुदत दिली गेली होती. पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वीच नवलखा यांनी आमच्याकडे ही याचिका केलेली असल्याने त्यांना ती लागू होत नाही.

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे करून भीमा-कोरेगाव हिंसाचारास चिथावणी देण्याच्या आरोपांवरून विविध ठिकाणी धाडी टाकून पुणे पोलिसांनी नवलखा यांच्याखेरीज वरावरा राव (हैदराबाद), सुधा भारद्वाज (फरिदाबाद), अरुण फरेरा (ठाणे) व व्हर्नॉन गोन्साल्विस (मुंबई) यांना अटक केली होती. हे आरोपी बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचेही सक्रिय कार्यकर्ते असल्याचे तपासातून उघड झाल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने हे पाचही आरोपी आत्तापर्यंत नजरकैदेतच राहिल्याने त्यांच्यापैकी एकाचाही ताबा पोलिसांना मिळालेला नाही.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारHigh Courtउच्च न्यायालय