शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
4
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
5
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
6
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
7
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
8
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
9
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
10
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
11
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
12
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
13
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
14
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
15
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
16
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
17
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
18
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
19
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
20
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?

नेतृत्वबदलाबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई? मिळताहेत असे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 20:57 IST

नेतृत्वबदलावरून काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद अखेर आज सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संपुष्टात आला आहे.

नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून सुरू असलेला वाद अखेर आज सोनिया गांधी यांची पुन्हा हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काहीसा निवळला आहे. मात्र नेतृत्वबदलावरून सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधीना पत्र लिहिणाऱ्या या नेत्यांवर पक्षाच्या घटनेनुसार कारवाई होणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सांगितल्याचे एएनआयने सूत्र्यांच्या हवाल्याने सांगितले आहे.दरम्यान, गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी सांगितले की आम्ही मर्यादेत राहून प्रश्न उपस्थित केले आहेत. असे असूनही जर कुणाला हा शिस्तभंग वाटत असेत तर त्यांनी आमच्यावर कारवाई करावी. संघटनेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आमचे काही प्रश्न होते. त्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही पत्र लिहिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.आज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधींकडेच पक्षाचे हंगामी अध्यक्षपद कायम ठेवावे, असा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती कार्यकारी समितीचे सदस्य के.एच मणियप्पा यांनी सांगितले की, सोनिया गांधींना हंगामी अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय एकमताने घण्यात आला आहे. पक्षामध्ये नेतृत्वाबाबत कुठलेही मतभेद नाही आहेत. तसेच गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक आणि आनंद शर्मा यांनीही नेतृत्वाबाबत कुठलाही वाद नाही, असे लिहून दिले आहे. तर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठीची पुढील बैठक ही पुढच्या सहा महिन्यांत होईल, असे पी.एल. पुनिया यांनी सांगितले.राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाम, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, शशी थरूर, खासदार विवेक तनखा, अकउउ आणि उहउ चे मुकुल वासनिक आणि जितिन प्रसाद, माजी मुख्‍यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, राजेंद्र कौर भटट्ल, वीरप्‍पा मोइली, पृथ्‍वीराज चव्‍हाण, पी. जे. कुरियन, अजय सिंह, रेणुका चौधरी आणि मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष सांभाळण्याचा अनुभव असलेले राज बब्‍बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह यांच्यासह अखिलेश प्रसाद सिंह, कुलदीप शर्मा, योगानंद शास्‍त्री आणि संदीप दीक्षित यांनी नेतृत्वबदलाबाबत पत्र लिहिले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPoliticsराजकारण