पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. दरम्यान, भारताने पाकिस्तानी विमानांवर भारतीय हवाई हद्दील प्रवेश नाकारला होता. अजूनही पाकिस्तानी विमानांसासाठी भारताने हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद केले. दुसरीकडे, पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ सप्टेंबरपर्यंत बंद केले.
हवाई क्षेत्र बंद करण्यासाठी दोन्ही देशांनी एअरमेनना स्वतंत्र नोटीस जारी केली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता, भारताने ३० एप्रिलपासून आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. यामध्ये पाकिस्तानी विमान कंपन्या आणि ऑपरेटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या, मालकीच्या किंवा भाड्याने घेतलेल्या विमानांचा समावेश आहे, यामध्ये लष्करी उड्डाणांचा देखील समावेश आहे.
दोन्ही देशांनी हवाई क्षेत्र बंद ठेवले
दोन्ही देशांनी बंदी वाढवली आहे. २२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या NOTAM नुसार, पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत विमाने आणि पाकिस्तानी एअरलाइन्स/ऑपरेटरद्वारे चालवल्या जाणाऱ्या/मालकीच्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसाठी, यामध्ये लष्करी उड्डाणांचा समावेश आहे, भारतीय हवाई क्षेत्र उपलब्ध राहणार नाही. २३ सप्टेंबर रोजी २३५९ तास पासून २४ सप्टेंबर रोजी ०५.३० तासपर्यंत हवाई क्षेत्र बंद राहणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या विविध उपाययोजनांचा भाग म्हणून ही बंदी सुरुवातीला २४ मे पर्यंत होती. त्यानंतर दर महिन्याला ती वाढवण्यात आली.
पाकिस्ताननेही NOTAM जारी केला
२४ ऑगस्टपर्यंत लागू असलेले हे निर्बंध आता २४ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहेत. पाकिस्तानने २० ऑगस्ट रोजी NOTAM जारी करून भारतीय विमानांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा कालावधी वाढवला. NOTAM ही एक अधिसूचना असते. यामध्ये उड्डाण ऑपरेशन्समध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेली माहिती असते.