शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

न्याय व न्यायपालिकेच्या हितासाठीच उठवला आवाज- कुरियन जोसेफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 18:06 IST

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या कारभाराविरोधातली नाराजी उघड व्यक्त करणाऱ्या 4 न्यायाधीशांपैकी कुरियन जोसेफ यांनी हे प्रकरण लवकरच निवळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या कारभाराविरोधातली नाराजी उघड व्यक्त करणाऱ्या 4 न्यायाधीशांपैकी कुरियन जोसेफ यांनी हे प्रकरण लवकरच निवळेल अशी आशा व्यक्त केली आहे. कुरियन जोसेफ, जे चेलमेश्वर, मदन लोकूर आणि रंजन गोगोई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर आरोप केले. सरन्यायाधीश पसंतीच्या न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले सुपूर्द करत असल्याचा आरोप केला होता. यावर शनिवारी कुरियन यांनी हे संपूर्ण प्रकरण न्याय आणि न्यायपालिकेच्या हितासाठी पुढे आणल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टात्या न्यायाधिशांनी अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत नाराजी व्यक्त करण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. 

'न्यायाधीशांनी हे पाऊन उचलल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल. आम्ही न्याय आणि न्यायपालिकेच्या हितासाठी आवाज उठवला आहे. यापेक्षा अधिक मला काही सांगायचं नाही,' असं कुरियन जोसेफ यांनी केरळमधील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलं. 

ज्या प्रकारे हे प्रकरण देशासमोर आले आहे, त्याचप्रकारे त्यावरील मार्गही निघेल. न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास वाढवण्यासाठीच हे पाऊल उचललं, असं कुरियन जोसेफ केरळमधील वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.  

नेमकं प्रकरण काय ?

 देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली.  गेल्या दोन महिन्यांतील कारभारामुळे आम्ही वरिष्ठ न्यायमूर्ती दुःखी झालो आहोत. यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत. याबाबत सरन्यायाधीशांसोबतही बोललो पण काही उपयोग झाला नाही असं ते म्हणाले.  आम्ही आमचा आत्मा विकला आहे असं उद्या कोणी म्हणू नये, न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाही टिकणार नाही असं ते म्हणाले. या प्रकरणी सरन्यायाधिशांना दोन महिन्यांपूर्वी एक पत्र पाठवलं होतं असं सांगत चेलमेश्वर यांनी ते पत्र सार्वजनिक केलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय