शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'अच्छे दिन' वास्तवात कधीच नसतात; नितीन गडकरींचा युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 15:26 IST

 प्रत्येक माणूस हा असमाधानी असतो, त्यामुळे वास्तवात 'अच्छे दिन' कधीच नसतात.

नवी दिल्ली- सुख हे मानण्यावर असतं, या उक्तीच्या आधारे, 'अच्छे दिन' हे मानण्यावर असतात, असं 'लॉजिक' मांडत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोदी सरकारचा बचाव केला आहे.  प्रत्येक माणूस हा असमाधानी असतो, त्यामुळे वास्तवात 'अच्छे दिन' कधीच नसतात, असा युक्तिवाद त्यांनी केला. 

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 'रोड टू २०१९  : स्पीड बम्प अहेड?' या विषयावरील चर्चासत्रात नितीन गडकरी सहभागी झाले होते. देशात 'अच्छे दिन' आले, असं भाजपा २०१९च्या प्रचारात ठामपणे म्हणू शकेल का?, असा प्रश्न विचारल्यानंतर गडकरींनी थोडा सावध पवित्रा घेतला. 

'जो नगरसेवक असतो, त्याला आमदार व्हायचं असतं, आमदाराला खासदारकी खुणावत असते, खासदाराला मंत्री होण्याचं स्वप्न पडतं आणि मंत्र्यांना चांगल्या खात्याचं मंत्री व्हायचं असतं. ज्याच्याकडे मर्सिडीज असते तोही दुःखी असतो आणि बाइक असते तोही. अच्छे दिन हे मानण्यावर असतात. रोटी, कपडा और मकान म्हणजेच अच्छे दिन', असं जीवनाचं तत्वज्ञानच नितीन गडकरींनी सांगितलं. पंतप्रधान आवास योजनेतून घर बनत नाहीएत का?, सागरमाला प्रकल्पात १६ लाख कोटींची गुंतवणूक झालीय. हे अच्छे दिन नाहीत का?, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. काँग्रेसने जे ५० वर्षांत केलं नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवलं. सगळ्या अपेक्षा पाच वर्षांत पूर्ण होऊही शकत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं. 

२०१९ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचं काँग्रेसचं स्वप्न हे मुंगेरी लालच्या स्वप्नासारखंच आहे, असा टोला गडकरींनी लगावला. ईशान्य भारतातील निवडणुकीत त्यांची काय अवस्था झाली बघा, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा