शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

लंकेश हत्या प्रकरणाच्या वार्तांकनावर अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिकनची लाज वाटते असं सांगत पत्रकाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:10 IST

गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारंसौदी अरेबिया व उत्तर कोरिया या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा

मुंबई, दि. 8 - अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही बातमीशी ईमान राखत नसल्याचा आरोप करत एका पत्रकारानं राजीनामा दिला आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

अत्यंत अप्रामाणिक सरकारची, म्हणजे भाजपा प्रणित केंद्र सरकारची बाजू घेत रिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारं असल्याची चीड त्यांनी व्यक्त केली आहे. "भाजपा व आरएसएसच्या लोकांकडून धमक्या आल्यानंतर गौरी यांची निर्घृण हत्या झाली. अशा खुन्यांना प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार कसा काय करता? तुमची कामाप्रती निष्ठा कुठे गेली?" असा सवाल नंदी यांनी रिपब्लिक टिव्हीला विचारला आहे.

प्रस्थापितांविरोधात आवाज उठवणाऱ्या लंकेश यांची राहत्या घरी मंगळवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कट्टर उजव्या विचारसरणीविरोधात आवाज उठवण्यासाठी लंकेश प्रसिद्ध होत्या. त्यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांना कायदेशीर मार्गाने आपला आवाज मांडता येणार की नाही. का विरोधी मत व्यक्त केल्यावर थेट हिंसाचारास सामोरे जावं लागू शकतं असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

रिपब्लिकच्या वृत्तांकनाबाबत बोलताना नंदी यांनी सौदी अरेबिया व उत्तर कोरियाच्या सरकारी निर्बंधातील पत्रकारितेचा हवाला दिला आहे. या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. जर लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभानं आपला आत्मा विकला तर समाजाची काय अवस्था होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. रिपब्लिकनसारख्या बेईमान संस्थेत काम केल्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशSocial Mediaसोशल मीडिया