शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

लंकेश हत्या प्रकरणाच्या वार्तांकनावर अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिकनची लाज वाटते असं सांगत पत्रकाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:10 IST

गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारंसौदी अरेबिया व उत्तर कोरिया या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा

मुंबई, दि. 8 - अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही बातमीशी ईमान राखत नसल्याचा आरोप करत एका पत्रकारानं राजीनामा दिला आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

अत्यंत अप्रामाणिक सरकारची, म्हणजे भाजपा प्रणित केंद्र सरकारची बाजू घेत रिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारं असल्याची चीड त्यांनी व्यक्त केली आहे. "भाजपा व आरएसएसच्या लोकांकडून धमक्या आल्यानंतर गौरी यांची निर्घृण हत्या झाली. अशा खुन्यांना प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार कसा काय करता? तुमची कामाप्रती निष्ठा कुठे गेली?" असा सवाल नंदी यांनी रिपब्लिक टिव्हीला विचारला आहे.

प्रस्थापितांविरोधात आवाज उठवणाऱ्या लंकेश यांची राहत्या घरी मंगळवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कट्टर उजव्या विचारसरणीविरोधात आवाज उठवण्यासाठी लंकेश प्रसिद्ध होत्या. त्यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांना कायदेशीर मार्गाने आपला आवाज मांडता येणार की नाही. का विरोधी मत व्यक्त केल्यावर थेट हिंसाचारास सामोरे जावं लागू शकतं असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

रिपब्लिकच्या वृत्तांकनाबाबत बोलताना नंदी यांनी सौदी अरेबिया व उत्तर कोरियाच्या सरकारी निर्बंधातील पत्रकारितेचा हवाला दिला आहे. या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. जर लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभानं आपला आत्मा विकला तर समाजाची काय अवस्था होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. रिपब्लिकनसारख्या बेईमान संस्थेत काम केल्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशSocial Mediaसोशल मीडिया