शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लंकेश हत्या प्रकरणाच्या वार्तांकनावर अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिकनची लाज वाटते असं सांगत पत्रकाराचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 12:10 IST

गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देरिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारंसौदी अरेबिया व उत्तर कोरिया या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा

मुंबई, दि. 8 - अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही बातमीशी ईमान राखत नसल्याचा आरोप करत एका पत्रकारानं राजीनामा दिला आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीनं चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला व फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

अत्यंत अप्रामाणिक सरकारची, म्हणजे भाजपा प्रणित केंद्र सरकारची बाजू घेत रिपब्लिक टिव्हीनं ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येचं वृत्तांकन केलं ते शरम वाटणारं असल्याची चीड त्यांनी व्यक्त केली आहे. "भाजपा व आरएसएसच्या लोकांकडून धमक्या आल्यानंतर गौरी यांची निर्घृण हत्या झाली. अशा खुन्यांना प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार कसा काय करता? तुमची कामाप्रती निष्ठा कुठे गेली?" असा सवाल नंदी यांनी रिपब्लिक टिव्हीला विचारला आहे.

प्रस्थापितांविरोधात आवाज उठवणाऱ्या लंकेश यांची राहत्या घरी मंगळवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कट्टर उजव्या विचारसरणीविरोधात आवाज उठवण्यासाठी लंकेश प्रसिद्ध होत्या. त्यांची हत्या झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विरोधकांना कायदेशीर मार्गाने आपला आवाज मांडता येणार की नाही. का विरोधी मत व्यक्त केल्यावर थेट हिंसाचारास सामोरे जावं लागू शकतं असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

रिपब्लिकच्या वृत्तांकनाबाबत बोलताना नंदी यांनी सौदी अरेबिया व उत्तर कोरियाच्या सरकारी निर्बंधातील पत्रकारितेचा हवाला दिला आहे. या दोन देशांप्रमाणेच भारतातल्या पत्रकारितेची अवस्था होईल असा इशारा त्यांनी दिला आहे. जर लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभानं आपला आत्मा विकला तर समाजाची काय अवस्था होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. रिपब्लिकनसारख्या बेईमान संस्थेत काम केल्याबद्दल आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशSocial Mediaसोशल मीडिया