शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Accident: भीषण अपघात, भरधाव इनोव्हाने ९ जणांना चिरडले, ५ जण मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 13:35 IST

Accident: कालका-सिमला राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव इनोव्हा कारने पादचाऱ्यांना चिरडले.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील आज सकाळी एक भीषण अपघात झाला. येथील धर्मपूरमध्ये कालका-सिमला राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव इनोव्हा कारने पादचाऱ्यांना चिरडले.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना पीजीआयमध्ये अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. तर अन्य दोन जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार कालका-सिमला महामार्गावर धर्मपूर येथील ही घटना आहे. मंगळवारी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. एक इनोव्हा भरधाव वेगाने सिमलाच्या   दिशेने येत होती. यादरम्यान, वळणावर वाहनचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या कारने तिथून जात असलेल्या पादचाऱ्यांना चिरडले.

या भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर इतर चार जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून दोन गंभीर जखमींना चंडीगड येथील पीजीआयमध्ये अधिक उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच मृत आणि जखमींची ओळख पटली आहे.

आज सकाळी सोलन येथील धर्मपूरमधील  सुक्की जोहडी येथे काही लोक पायी जात होते‌. अपघाताची शिकार झालेले सर्व जण प्रवासी मजूर असून ते उत्तर प्रदेशमधील कुशीनगर आणि बिहारमधील छपरा येथील रहिवासी आहेत. मृतांची ओळख गुड्डू यादव, राजा वर्मा, निप्पू निसाद आणि मोतीलाल यादव आणि सन्नी देवल अशी पटली आहे.

टॅग्स :AccidentअपघातHimachal Pradeshहिमाचल प्रदेश