शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 19:04 IST

विमानात प्रवाशांना एसीशिवाय गरमीमध्ये बसावं लागलं. प्रवाशांमध्ये लहान मुलं आणि वृद्ध होते. उकाड्यामुळे त्यापैकी अनेकांची प्रकृती बिघडली.

अहमदाबाद विमान अपघातानंतर आता दुबईहून जयपूरला येणारं एअर इंडियाचं विमान ५ तास उशिराने उड्डाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणात हा विलंब झाला. मात्र या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे दुबई विमानतळावर विमानात प्रवाशांना एसीशिवाय गरमीमध्ये बसावं लागलं. प्रवाशांमध्ये लहान मुलं आणि वृद्ध होते. उकाड्यामुळे त्यापैकी अनेकांची प्रकृती बिघडली.

सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. विमानातील एका प्रवाशाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं आहे की, दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX १९६ मधील प्रवाशांना पाच तास एसीशिवाय बसून ठेवण्यात आलं होतं. या काळात विमानात उपस्थित असलेल्या वृद्ध आणि मुलांची तब्येत बिघडली. ही घटना १३ जूनच्या रात्री घडली आहे.

मुलं रडू लागली, वृद्धांची तब्येत बिघडली

दुबईहून जयपूरला येणारी एअर इंडिया एक्सप्रेसची इंटरनॅशनल फ्लाईट IX १९६  ७:२५ वाजता दुबईहून निघणार होतं, परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्याचं उड्डाण अनेक तास उशिरा झालं. अखेर विमान १२:४५ वाजता दुबईहून जयपूरला निघालं, परंतु त्यापूर्वी प्रवाशांना सुमारे ५ तास एसीशिवाय विमानात बसवून ठेवण्यात आलं. या काळात विमानात प्रचंड उष्णता होती आणि त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांची प्रकृती बिघडली.

प्रवाशांनी केले गंभीर आरोप 

प्रवाशांनी एअरलाईन्सवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, या काळात त्यांना साधं पाणीही देण्यात आलं नाही किंवा उशीर होत असल्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही.

प्रवाशांनी सांगितलं की, आम्ही ५ तास पंखा आणि एसीशिवाय भीषण गरमीमध्ये विमानात बसलो होतो. याच दरम्यान मुलं रडत होती आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ही बाब आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विमानातील लोक गरमीमुळे हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ते पेपरने वारा घालताना दिसत आहेत. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDubaiदुबई