शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अभाविप व डाव्या पक्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; जेएनयूत पुन्हा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 10:42 IST

दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री जेवणाच्या मेन्यूवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात काही विद्यार्थी जखमी झाले.

नवी दिल्ली :

दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री जेवणाच्या मेन्यूवरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात काही विद्यार्थी जखमी झाले. यात दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले. या प्रकरणी जेएनयूच्या कुलसचिवांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले, तर पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

जवळपास दोन वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती. रविवारी रात्री पहिल्यांदा पूजा करण्यावरून अभाविप व डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली. 

रामनवमीनिमित्त कावेरी वसतिगृहात पूजा व हवन आयोजित केला होता. यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविला. परंतु, वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांना शांत केल्यानंतर हवन शांतपणे पार पडले. 

भोजनावेळी हा वाद पुन्हा उफाळून आला. भोजनामध्ये मांसाहारी पदार्थ होते. यावर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. रामनवमीच्या दिवशी मांसाहार कसा झाला, यावरून दोन्ही गटांच्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. काही विद्यार्थी जखमी झाले. यासाठी डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी जबाबदार असल्याचा आरोप जेएनयूच्या अभाविपचे सचिव उमेश अजमेरा यांनी केला आहे. या आरोपांचा डीएसएफ या संघटनेने इन्कार केला आहे. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या घेऊन हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांना चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

कुलसचिव काय म्हणाले...- या घटनेवर जेएनयूचे कुलसचिव प्रो. रविकेश यांनी निवेदन प्रसिद्ध करून जेएनयूची बाजू मांडली आहे. जेएनयूच्या मेसचे संचालन विद्यार्थी समितीकडून होते.- त्यामुळे भोजनामध्ये कोणते पदार्थ शिजवायचे, हा त्यांचा प्रश्न असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जेएनयूला मोठा शैक्षणिक वारसा लाभला आहे. - हा वारशाचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. यात बाहेरच्या शक्तींनी हस्तक्षेप करू नये, असेही या निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयू