्नरेल्वेला थांबा नसतानाही जीव धोक्यात घालून उतरतात प्रवाशी अमळनेर, धरणगाव स्थानकावरील प्रक ार
By Admin | Updated: November 29, 2015 23:57 IST2015-11-29T23:57:07+5:302015-11-29T23:57:07+5:30
जळगाव : सुरत - भुसावळ रेल्वेलाईनवरील अमळनेर व धरणगाव स्थानकावर काही जलद गाड्यांना थांबा नसतानाही सुमारे पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी आपला जीव धोक्यात घालून धावत्या गाडीतून स्थानकावर खाली उतरतात. नुकताच डोंबिवली स्थानकावर लोकलमधील गर्दीमुळे एक ा तरुणाला चुकी नसतानाही आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या परिसरातही अशी अप्रीय घटना घडू शकते.

्नरेल्वेला थांबा नसतानाही जीव धोक्यात घालून उतरतात प्रवाशी अमळनेर, धरणगाव स्थानकावरील प्रक ार
ज गाव : सुरत - भुसावळ रेल्वेलाईनवरील अमळनेर व धरणगाव स्थानकावर काही जलद गाड्यांना थांबा नसतानाही सुमारे पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी आपला जीव धोक्यात घालून धावत्या गाडीतून स्थानकावर खाली उतरतात. नुकताच डोंबिवली स्थानकावर लोकलमधील गर्दीमुळे एक ा तरुणाला चुकी नसतानाही आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या परिसरातही अशी अप्रीय घटना घडू शकते. अमळनेर व धरणगाव परिसरातील पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी रोजगारासाठी रोज सकाळी ७ वाजेची सुरत-भुसावळ पॅसेंजर तसेच ९.२० वाजेच्या अहमदाबाद - हावडा या गाडीने जळगाव येथे येतात. कर्तव्य आटोपल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगावहून गावाकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतात. मात्र पाच ते सात वाजेदरम्यान या ठराविक वेळेत गाड्या उपलब्ध नसल्याने मिळतील त्या थांबा नसलेल्या जलद गाड्यांवर बसुन लवकर घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात प्रवास केला जातो. जीव धोक्यात घालून धावत्या गाड्यांवरून खाली उतरतात प्रवाशीकर्तव्य पार पाडल्यानंतर प्रवाशी जळगाव स्थानकावर पाच वाजेच्या सुमारास स्थानकावर परतीच्या प्रवासासाठी येतात. जलद गाड्यांवर बसल्यानंतर धरणगाव व अमळनेर स्थानक आल्यावर प्रवाशांची उतरण्यासाठी लगबग सुरू होते. स्थानकावर गाडीची गती सावकाश झाल्याने प्रवाशी गाडीतून खाली उड्या मारुन उतरतात. बर्याचदा घसरुन खाली पडण्याच्या घटनांबरोबर अपघातदेखील झाले आहेत. थांबा नसलेल्या ा गाड्यांवर होतो प्रवासजळगाव स्थानकावरुन चेन्नई जोधपुर एक्सप्रेस, अहमदाबाद नागपूर प्रेरणा एक्सप्रेस, विशाखापणम गांधीधाम एक्सप्रेस व दाणापुर-उधना एक्सप्रेस या गाड्यांना धरणगाव व अमळनेर स्थानकावर थांबा नाही. पण तरीही रोज पाचशेपेक्षा जास्त प्रवाशी आपल्या जीवाची पर्वा न करता स्थानकावर खाली उतरतात. क ाही गाड्यांना थांबा द्यावा कामानिमित्त रोज जिल्ाच्या ठिकाणी यावे लागत असल्याने बसचा प्रवास परवडत नाही. रेल्वेचा प्रवास सोयीस्कर आहे. मात्र ठराविक वेळेच्या गाड्या थांबत नसल्याने धोक्याचा प्रवास करावा लागतो. वरील गाड्यांना अमळनेर व धरणगाव स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.