शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

अर्थव्यवस्थेत मंदीतून बाहेर पडण्याची क्षमता -मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 06:12 IST

चढउतार होतच असतात : देशाला ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवूच

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या आर्थिक मंदीतून बाहेर पडण्याची पूर्ण क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. भारत पुन्हा एकदा उच्च आर्थिक वृद्धी प्राप्त करील, तसेच ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट प्राप्त करणेही शक्य आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

वाणिज्य व उद्योग क्षेत्रातील संघटना ‘असोचेम’च्या १00 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोदी यांनी हे वक्तव्य केले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे. सलग सहा तिमाहींच्या घसरणीनंतर आर्थिक वृद्धीचा दर सहा वर्षांच्या नीचांकावर येऊन ४.५ टक्के झाला आहे. बेरोजगारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यावरून मोदी यांच्या सरकारवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील वक्तव्य केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितीबाबत जे बोलले जात आहे, त्याबाबत मी कोणालाही दोष देणार नाही. मी टीकेतील चांगले तेवढे घेऊन पुढे जाणे पसंत करतो. यापूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संपुआ सरकारच्या काळात आर्थिक वृद्धीदर ३.५ टक्क्यांपर्यंत घसरला होता. किरकोळ महागाईचा दर ९.४ टक्क्यांपर्यंत वाढला होता. घाऊक महागाईचा दरही ५.२ टक्क्यांपर्यंत वर चढला होता. जीडीपीच्या तुलनेत राजकोषीय तूट ५.६ टक्क्यांपर्यंत वर गेली होती. तरीही मी याबाबत अकारण टीका करणार नाही. अर्थव्यवस्थेत असे चढ-उतार होतच असतात. सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्यास देशाची अर्थव्यवस्था पूर्णत: समर्थ आहे.

मोदी यांनी म्हटले की, आमचे इरादे मजबूत आहेत. २0२४ पर्यंत भारताला ५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त केले जाईल. हे उद्दिष्ट प्राप्त करणे शक्य आहे. उद्योगपतींनी यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी. आपण अधिक संपत्ती व रोजगारनिर्मिती करून अर्थव्यवस्थेला ५ हजार अब्ज डॉलरवर नेण्याच्या कार्यातील आपली भागीदारी निभवावी. बुद्धी, भांडवल आणि श्रम हे तीन घटक एकत्र आले तर ५ हजार अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सहज साध्य केले जाईल.सुधारणांची प्रक्रिया सुरूचसरकारने केलेल्या सुधारणांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, कंपनी कायद्यातील काही तरतुदी अशा होत्या की, छोट्या-छोट्या चुकांसाठीही उद्योगांना फौजदारी कारवाई सहन करावी लागत होती. आपल्या सरकारने या तरतुदींना फौजदारी श्रेणीतून हटविले. यातील सुधारणांची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आपल्या काही सूचना असल्यास जरूर सांगा.आम्ही जनतेचे एजंट : मोदी म्हणाले की, देशासाठी सगळे सहन करावे लागते. आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याचे आरोप झाले. पण मी आपणास सांगू इच्छितो की, आम्ही उद्योगपतींचे नव्हे, तर १३0 कोटी भारतीयांचे एजंट आहोत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी