शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

'आप'ला राष्ट्रीय पक्ष होण्याचे वेध; बिहार निवडणुकीवर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 14:37 IST

विरोधकांचा चेहरा म्हणून पुढं येण्याची क्षमता केजरीवाल यांच्यामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या स्वरात सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीवर तिसऱ्यांदा विजयाचा झेंडा फडकवला. दिल्लीत आपलं बस्तान बसवणाऱ्या आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पातळीवर स्थिर करण्यासाठी योजना करण्यात येत आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून त्याचा पहिला टप्पा बिहार निवडणूक असण्याची शक्यता आहे.

'आप'च्या विजयानंतर दिल्लीतील कार्यालयात एक पोस्टर झळकले. यावर राष्ट्र उभारणीसाठी आम आदमी पक्षात सामील व्हा, असं आवाहन करण्यात आले आहे. दिल्लीत विजयाची हॅटट्रीक साधल्यानंतर पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी केजरीवाल प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवीन सदस्य जोडणीला पहिल्या दिवशीपासूनच प्राधान्य देण्यात 'आप'ने सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणूक निर्णायक ठरू शकते.  याआधी केजरीवाल यांनी 'आप'ला देशातील इतर राज्यात रुजवण्याचा प्रयत्न केला होता. पंजाबमध्ये त्यांना चांगले यश आले होते. मात्र पक्षांतर्गत मतभेदामुळे पंजाबमधूनही आपची पिछेहाट झाली. आता आपने कात टाकली आहे. तर विरोधकांचा चेहरा म्हणून पुढं येण्याची क्षमता केजरीवाल यांच्यामध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या स्वरात सुरू झाली आहे. 

काँग्रेसची जागा घेण्याची संधी

दिल्लीत काँग्रेसला सत्तेतून बाहेर करत आम आदमी पक्षाने आपले बस्तान बसवले आहे. काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या साम्राज्याला केजरीवाल यांनी सुरंग लावला. सलग दुसऱ्यांना काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आलं नाही. अर्थात काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवत केजरीवाल यांनी दिल्लीतील स्पेस भरून काढला. आता काँग्रेसशासित राज्यातही केजरीवाल हाच पॅटर्न राबविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी सदस्य जोडणीवर भर देण्यात येत आहे.