शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

"भारतातले गरीब संपले का, इतर देशातले इकडे कशाला आणताय?"; 'आप'चा भाजपावर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 17:16 IST

"CAA मुळे देशात दंगली घडतील, महिलांवरील अत्याचार वाढतील", अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Priyanka Kakkar, BJP vs AAP, CAA : भारत सरकारने दोनच दिवसांपूर्वीच देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) लागू केला. भाजपा सरकारकडून या कायद्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे तर विरोधक यावर टीका करत आहेत. असे असताना, आम आदमी पार्टी (AAP) आक्रमकपणे कायद्याला विरोध करताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता की, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून लोक आल्याने देशात चोरी आणि बलात्काराच्या घटना वाढतील। त्यातच आता त्यांच्याच पक्षातील आणखी एका महिला नेत्याने यावर भाष्य केले आहे. भारतातील गरीब लोक संपले आहेत का, भाजप बाहेरील गरीबांना देशात आणून स्थायिक करण्याचा हट्ट का धरत आहे?, असा सवाल आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी केला. तसेच, या कायद्याच्या अंमलबजावणीचा दूरगामी परिणाम म्हणजे या देशात दंगलीही होऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या.

एएनआयशी बोलताना प्रियंका कक्कर यांनी देशात सौहार्द बिघडण्याची आणि दंगली होण्याची भीती व्यक्त केली. केजरीवाल यांच्या मुद्द्यांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. त्यात त्यांनी चोरी आणि महिलांवरील अत्याचार वाढण्याची भीती व्यक्त केली. प्रियंका कक्कर म्हणाल्या, "पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील लोकांना आपल्या देशात आणून स्थायिक केले जाईल. त्यांची व्यवस्था कुठे केली जाणार? तुम्हीच विचार करा, तुमच्या घरासमोरच्या झोपडपट्टीत एक पाकिस्तानी असेल तर तुमची मुलगी आणि तुम्हाला सुरक्षित वाटेल का? कायदा आणि सुव्यवस्थेची हमी भाजपा घेणार आहे का? अशा गोष्टींनी भविष्यात भारतात दंगली होतील, सौहार्द बिघडेल, चोरी, लुटमार वाढेल. भाजपला हेच सारं करायचं आहे का?"

भारतातले गरीब संपले का, देशाबाहेरचे गरीब का आणताय?

"भारतातले दैनंदिन प्रश्न संपले का, देशातील महागाई संपली का, बेरोजगारी संपली का? भारतातले गरिब संपले का, मग इतर देशातील गरिबांना इथे आणून स्थायिक करायचा हट्ट का बाळगत आहात?" असा सवाल कक्कर यांनी केला. "आपल्या देशातील 11 लाख श्रीमंत लोक देश सोडून गेले जे रोजगार देत होते. मोदीजींनी त्यांना परत आणले पाहिजे आणि संपूर्ण देशातील गरीब लोकांचा बंदोबस्त करून आमच्या संसाधनात हिस्सा देऊ नये. बेकायदेशीर घुसखोरी कायदेशीर करा, असे म्हणणारे भाजपचेच सरकार आहे. प्रत्येकाला नागरिकत्व दिल्यामुळे कॅनडातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली. कॅनडाने सर्वप्रथम प्रत्येकाला नागरिकत्व दिले. आज तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पहा. जे देश अवैध स्थलांतर रोखत आहेत, त्यांच्याकडून धडा घेतला पाहिजे. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होईल. तो तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात यावा," असे कक्कर यांनी सांगितले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शाहAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालPakistanपाकिस्तान