शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:52 IST

Arvind Kejriwal : केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली : दिल्ली ही जगातील सर्वात असुरक्षित राजधानी असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांनी गुरुवारी (दि.२८) म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी एक नकाशा दाखवला. ज्यामध्ये अमित शाहांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर परिसरात अलीकडच्या काळात किती गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, हे नकाशाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला.

आज मला जड अंतःकरणाने ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुंबईसारखे गँगवार दिसत आहे. आज दिल्ली ही जगातील सर्वात असुरक्षित राजधानी आहे. गेल्या तीन महिन्यांत यमुनेच्या पलीकडे झालेल्या गँगवॉरमध्ये २० जणांना आपला जीव गमवावा लागला, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, दहा वर्षांपूर्वी मला एक जिम्मेदारी मिळाली. त्यावेळी शाळा, वीज, आरोग्य, पाणी या सर्व गोष्टी मी व्यवस्थित केल्या. पाण्याची स्थिती सुधारत आहे. मात्र, दिल्लीतील सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आहे, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अमित शाह यांची आहे. अमित शाह दहा वर्षात कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात अपयशी ठरले आहेत. दिल्लीला रेप कॅपिटल, गँगस्टर कॅपिटल म्हटले जात आहे. आज महिला आणि व्यावसायिक सर्वाधिक घाबरले आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, त्यांनी सांगितले की, काल मी एका व्यावसायिकाला भेटायला नांगलोईला गेलो होतो, ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मी फक्त भेटायला गेलो होतो, पण भाजपचे खासदार आपल्या लोकांसह तिथे पोहोचले आणि मला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, मला रोखून काही होणार नाही.

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या एका वर्षात १६० खंडणीचे कॉल आले आहेत. तसेच, असे कितीतरी कॉल असतील, जे लोक सांगत नाहीत. एका व्यावसायिकाला परदेशी नंबरवरून खंडणीचा कॉल येतो आणि त्याने पैसे दिले नाही तर त्याला गोळ्या घातल्या जातील असे सांगितले जाते, जेणेकरून व्यावसायिकाने भीतीपोटी पैसे द्यावे. आज दिल्लीत व्यवसाय करणे हा गुन्हा ठरत आहे. या सर्व घटना अमित शाह यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर घडत आहे. जर अमित शहा आपल्या घराची २० किमीचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi capitalsदिल्ली कॅपिटल्सdelhiदिल्लीAAPआपAmit Shahअमित शाह