शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:52 IST

Arvind Kejriwal : केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली : दिल्ली ही जगातील सर्वात असुरक्षित राजधानी असल्याचे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांनी गुरुवारी (दि.२८) म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी एक नकाशा दाखवला. ज्यामध्ये अमित शाहांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर परिसरात अलीकडच्या काळात किती गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, हे नकाशाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला.

आज मला जड अंतःकरणाने ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. मुंबईसारखे गँगवार दिसत आहे. आज दिल्ली ही जगातील सर्वात असुरक्षित राजधानी आहे. गेल्या तीन महिन्यांत यमुनेच्या पलीकडे झालेल्या गँगवॉरमध्ये २० जणांना आपला जीव गमवावा लागला, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, दहा वर्षांपूर्वी मला एक जिम्मेदारी मिळाली. त्यावेळी शाळा, वीज, आरोग्य, पाणी या सर्व गोष्टी मी व्यवस्थित केल्या. पाण्याची स्थिती सुधारत आहे. मात्र, दिल्लीतील सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आहे, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अमित शाह यांची आहे. अमित शाह दहा वर्षात कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात अपयशी ठरले आहेत. दिल्लीला रेप कॅपिटल, गँगस्टर कॅपिटल म्हटले जात आहे. आज महिला आणि व्यावसायिक सर्वाधिक घाबरले आहेत, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, त्यांनी सांगितले की, काल मी एका व्यावसायिकाला भेटायला नांगलोईला गेलो होतो, ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मी फक्त भेटायला गेलो होतो, पण भाजपचे खासदार आपल्या लोकांसह तिथे पोहोचले आणि मला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, मला रोखून काही होणार नाही.

पुढे अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या एका वर्षात १६० खंडणीचे कॉल आले आहेत. तसेच, असे कितीतरी कॉल असतील, जे लोक सांगत नाहीत. एका व्यावसायिकाला परदेशी नंबरवरून खंडणीचा कॉल येतो आणि त्याने पैसे दिले नाही तर त्याला गोळ्या घातल्या जातील असे सांगितले जाते, जेणेकरून व्यावसायिकाने भीतीपोटी पैसे द्यावे. आज दिल्लीत व्यवसाय करणे हा गुन्हा ठरत आहे. या सर्व घटना अमित शाह यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर घडत आहे. जर अमित शहा आपल्या घराची २० किमीचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi capitalsदिल्ली कॅपिटल्सdelhiदिल्लीAAPआपAmit Shahअमित शाह