शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:05 IST

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीच्या रोहिणी भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाकडून रविवारी खंडणीची मागणी करण्यात आली. भाजपा दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाही, मग जनता त्यांना संपूर्ण दिल्लीची जबाबदारी कशी देऊ शकते? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. 

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत मनीष सिसोदिया यांनी सांगितलं की, "रविवारी पहाटे पुन्हा एकदा दिल्लीत एका व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. एकही दिवस जात नाही जेव्हा दिल्लीच्या विविध भागातून गोळीबार किंवा खंडणीची मागणी होत नाही. गँगस्टरचं नेटवर्क वाचवण्याच्या नादात भाजपाने दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली आहे. इतकी वाईट अवस्था आम्ही आजवर पाहिलेली नाही." 

"अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली १० दिवसांत कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात येईल. दिल्लीत दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या भागातून लोक खुलेआम पिस्तूल फिरवत असल्याच्या घटना आणि व्हिडिओ समोर येत आहेत. व्यापाऱ्यांना धमकावलं जात आहे. रविवारी सराफा व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे. ९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्ड ज्या स्थितीत राज्य करत असे, ती स्थिती भाजपाने दिल्लीत आणल्याचं दिसतं."

"आज दिल्लीत गुंडाराज आहे. कोणताही व्यापारी किंवा सामान्य माणूस सुरक्षित वाटत नाही. ज्याचा व्यवसाय चांगला चालतो त्याला गुंडाचा फोन येईल की काय अशी भीती वाटू लागते. भाजपाने दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिघडवली आहे की, देशाची राजधानी असूनही दिल्लीच्या कानाकोपऱ्यात दररोज गोळीबार आणि खंडणीच्या घटना समोर येत आहेत" असंही म्हटलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीManish Sisodiaमनीष सिसोदियाBJPभाजपाAAPआप