शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
4
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
5
पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
6
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी करेल मोठे नुकसान; ऐन दिवाळीत होईल पश्चात्ताप!
8
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
9
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची एन्ट्री, प्रोमो पाहून चाहते खूश; म्हणाले- "अंगावर काटा आला..."
10
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
11
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी
12
दिवाळीत आपलं कुटुंब ठेवा सुरक्षित! फक्त ५ रुपयांत ५०,००० चा विमा; या कंपनीने आणला 'फटाका इन्शुरन्स'
13
‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
14
Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
15
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
16
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
17
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
18
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
19
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!

Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:05 IST

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीच्या रोहिणी भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाकडून रविवारी खंडणीची मागणी करण्यात आली. भाजपा दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाही, मग जनता त्यांना संपूर्ण दिल्लीची जबाबदारी कशी देऊ शकते? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. 

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत मनीष सिसोदिया यांनी सांगितलं की, "रविवारी पहाटे पुन्हा एकदा दिल्लीत एका व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. एकही दिवस जात नाही जेव्हा दिल्लीच्या विविध भागातून गोळीबार किंवा खंडणीची मागणी होत नाही. गँगस्टरचं नेटवर्क वाचवण्याच्या नादात भाजपाने दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली आहे. इतकी वाईट अवस्था आम्ही आजवर पाहिलेली नाही." 

"अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली १० दिवसांत कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात येईल. दिल्लीत दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या भागातून लोक खुलेआम पिस्तूल फिरवत असल्याच्या घटना आणि व्हिडिओ समोर येत आहेत. व्यापाऱ्यांना धमकावलं जात आहे. रविवारी सराफा व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे. ९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्ड ज्या स्थितीत राज्य करत असे, ती स्थिती भाजपाने दिल्लीत आणल्याचं दिसतं."

"आज दिल्लीत गुंडाराज आहे. कोणताही व्यापारी किंवा सामान्य माणूस सुरक्षित वाटत नाही. ज्याचा व्यवसाय चांगला चालतो त्याला गुंडाचा फोन येईल की काय अशी भीती वाटू लागते. भाजपाने दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिघडवली आहे की, देशाची राजधानी असूनही दिल्लीच्या कानाकोपऱ्यात दररोज गोळीबार आणि खंडणीच्या घटना समोर येत आहेत" असंही म्हटलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीManish Sisodiaमनीष सिसोदियाBJPभाजपाAAPआप