शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:05 IST

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीच्या रोहिणी भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाकडून रविवारी खंडणीची मागणी करण्यात आली. भाजपा दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाही, मग जनता त्यांना संपूर्ण दिल्लीची जबाबदारी कशी देऊ शकते? असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे. 

दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत मनीष सिसोदिया यांनी सांगितलं की, "रविवारी पहाटे पुन्हा एकदा दिल्लीत एका व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. एकही दिवस जात नाही जेव्हा दिल्लीच्या विविध भागातून गोळीबार किंवा खंडणीची मागणी होत नाही. गँगस्टरचं नेटवर्क वाचवण्याच्या नादात भाजपाने दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली आहे. इतकी वाईट अवस्था आम्ही आजवर पाहिलेली नाही." 

"अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली १० दिवसांत कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात येईल. दिल्लीत दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या भागातून लोक खुलेआम पिस्तूल फिरवत असल्याच्या घटना आणि व्हिडिओ समोर येत आहेत. व्यापाऱ्यांना धमकावलं जात आहे. रविवारी सराफा व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे. ९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्ड ज्या स्थितीत राज्य करत असे, ती स्थिती भाजपाने दिल्लीत आणल्याचं दिसतं."

"आज दिल्लीत गुंडाराज आहे. कोणताही व्यापारी किंवा सामान्य माणूस सुरक्षित वाटत नाही. ज्याचा व्यवसाय चांगला चालतो त्याला गुंडाचा फोन येईल की काय अशी भीती वाटू लागते. भाजपाने दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिघडवली आहे की, देशाची राजधानी असूनही दिल्लीच्या कानाकोपऱ्यात दररोज गोळीबार आणि खंडणीच्या घटना समोर येत आहेत" असंही म्हटलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीManish Sisodiaमनीष सिसोदियाBJPभाजपाAAPआप