शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
4
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
5
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
6
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
7
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
8
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
9
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
10
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
11
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
12
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
13
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
14
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
15
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
16
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
17
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
18
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
19
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
20
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा

आमिर, 'अतुल्य' भारत 'असहिष्णू' कधीपासून बनला? अनुपम खेरचा सवाल

By admin | Published: November 24, 2015 9:28 AM

आमिर खानच्या देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर नाराजी नोंदवत अभिनेते अनुपम खेरनी त्याला लोकांमध्य भीती नव्हे आशा पसरवण्याचा सल्ला दिला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अभिनेता आमिर खानच्या देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर आता चहुबाजूंनी जोरदार टीका होत असून अभिनेते अनुपम खेर यांनी आमिरच्या वक्तव्यावर नाराजी नोंदवत त्याला लोकांमध्य भीती नव्हे तर आशा पसरवण्याचा सल्ला दिला आहे.  देशातील वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडण्याचा विचार करूया असे पत्नी किरणने सुचवल्याचे आमिरने काल एका कार्यक्रमात नमूद केले होते. त्यावरूनच आता विविध चर्चा सुरू झाल्या असून अनुपम खेर यांनी आमिरला ट्विटरवरून काही प्रश्न विचारले आहेत.
' डिअर आमिर खान, तुम्ही किरणला विचारलेत का की तिला कोणत्या देशात जाऊन रहायला आवडेल? आणि याच देशाने तुम्हाला 'आमिर खान' बनवले आहे, हे तुम्ही तिला सांगितलं आहे का?'  असा सवाल खेर यांनी ट्विटरवरून विचारला आहे. 'या देशात तुम्ही जीवनातील काही अतिशय वाईट क्षण घालवले आहेत, मात्र तेव्हाही तुम्ही हा देश सोडण्याचा विचार केला नव्हता, हे तुम्ही किरणला सांगितलतं का? 'अतुल्य भारत' तुमच्यासाठी केव्हापासून 'असिहष्णू भारत' बनला असेही खेर यांनी विचारले. 'जर देश असहिष्णू बनला आहे, असे मानून चाललो तर तुम्ही लाखो भारतीयांना देश सोडण्यास सांगाल की बदलाव होण्याची वाट पाहण्याचा सल्ला द्याल?' असे खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. 'सत्यमेव जयते'मधून तुम्ही समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रकाश टाकतानाही लोकांमध्ये आशेचा किरण निर्माण केला होता. मग आताच्या 'असहिष्णू' काळातही तुम्ही भीती न पसरवता लोकांना आशा दाखवली पाहिजे, असा सल्ला खेर यांनी आमिरला दिला. 
तर देशाला आपली मातृभूमी मानणारा माणूस देश सोडून जाण्याचा विचारच करणार नाही, असे अभिनेते व खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही आमिरच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना हिंदूबहुल देशात तीन-तीन मुस्लिम सुपरस्टार असताना भारतात असहिष्णुता कशी असा सवाल विचारला आहे. 
 
ट्विटरकरांनीही व्यक्त केली नाराजी
बॉलिवूड कलाकारांसोबतच ट्विटरकरांनीही आमिरच्या वक्तव्यावर नाराजी नोंदवत त्याच्यावर टीका केली.
 ‏@AdityaMohrir  - भारत असिहष्णू असल्याचे वक्तव्य आमिर माहिती व प्रसारण मंत्री आणि अर्थमंत्र्यांसमोर करू शकला , त्यावरूनच हे सिद्ध होतो की भारत किती सहिष्णू देश आहे. 
@Chadhajii  - अतिथी देवो भव म्हणत परदेशी नागिरकांना भारताला भेट देण्याचे निमंत्रण देणा-या आमिर खानलाच भारताबाहेर जायचे आहे. ही किती दुर्दैवी गोष्ट आहे. 
 
एकीकडे आमिरवर टीका होत असतानाच त्याला गेल्या आठवड्यातच शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांचा दाखला देऊन त्यांची तुलना करण्यात येत आहे. एकीकडे आमिरच्या बायकोला मुलांची काळजी वाटते म्हणून तिला देश सोडून जावेसे वाटत आहे. तर दुसरीकडे देशासाठी प्राण देणारे कर्नल महाडिक यांची पत्नी स्वत: सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याची निर्आधर व्यक्त करत आहे. वयाची मर्यादा ओलांडली आहे म्हणून नाहीतर लेडी आर्मी ऑफिसर बनण्याची माझी खूप इच्छा आहे, अशी भावना शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती यांनी व्यक्त केली. आपली दोन्ही मुलही लष्करातच जातील असा निर्धारही त्यांनी यापूर्वी व्यक्त केला होता.