शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'आधारपासून अयोध्ये'पर्यंत... मावळत्या सरन्यायाधीशांसमोर महत्त्वाचे खटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 12:49 IST

आधार, शबरीमला, अयोध्येचे राम मंदिर अशा अनेक खटल्यांवर या महिन्यात निर्णय दिला जाईल किंवा त्यातील पुढील प्रक्रिया होईल.

नवी दिल्ली- भारताचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा ऑक्टोबर महिन्यामध्ये निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी त्यांच्यासमोर असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर ते निर्णय देण्याची शक्यता आहे. आधारला कायदेशीर मान्यता आहे का तसेच इस्लाममध्ये मशिदीचे स्थान अशा प्रकरणांवर ते निर्णय देतील किंवा मोठ्या खंडपिठाकडे सोपवतील. तसेच आपल्यानंतरच्या सरन्यायाधीशांचे नावही सुचवाने लागणार आहे. आजवरच्या परंपरेनुसार सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचवतात. कायदा मंत्रालयाने त्यावर मत दिल्यानंतर राष्ट्रपती त्या नावावर शिक्कामोर्तब करतात. दीपक मिस्रा यांच्यानंतर रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत.

आधार सुनावणी-प्रत्येक व्यक्तीला खासगीपण जपण्याचा अधिकार आहे हे सर्वोच्च न्यायालायानेच स्पष्ट केलेले आहे. मात्र आधारमुळे व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची संधी सरकारला मिळते असा आरोप काही लोकांनी केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्याच्या वैधतेबाबत अजूनही प्रकरण प्रलंबित आहे.ज्येष्ठ वकील केटीएस तुलसी यांनी आधार संलग्न केलेल्या ग्राहकांची माहिती 210 केंद्रीय संकेतस्थळांवर उघड झाल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या समोर सिद्ध केले होते. ही परिस्थिती आणखी बिघडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. आधारबाबत दीपक मिस्रा यांनी चार महिने चाललेली सुनावणी मे महिन्यामध्ये पूर्ण केली आहे. आधारबरोबरच त्यांच्यासमोर इतरही अनेक महत्त्वाची प्रकरणे आहेत. यामध्ये आरोप असणारे लोकप्रतिनिधींची पात्रता रद्द करावी का?पारशी व हिंदू महिलांचे धार्मिक अधिकार तसेच ठराविक वयाच्याच महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश नाकारणे अशा खटल्यांचा समावेश आहे.

दुर्मिळ योगायोग; पुढील ५ वर्षांत देशाचे ३ सरन्यायाधीश मराठी

राम मंदिर खटला-सरन्यायाधीश या कालावधीत मशिदी या इस्लाममध्ये अविभाज्य घटक आहेत का या मुद्द्यावरील प्रकरणाला मोठ्या खंडपिठाकडे सोपवतील अशी शक्यता आहे. जुलै महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील आपला निर्णय राखून ठेवला होता. 1994 साली मशिदी या इस्लामच्या अविभाज्य घटक नाहीत असे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवावे अशी विनंती कोर्टाला करण्यात आली होती. कोर्टाच्या निरीक्षणामुळे अयोध्येच्या राममंदिर खटल्यामध्ये आमची बाजू कमकुवत होईल अशी भीती काही गटांनी व्यक्त केली होती.

संस्थेवर टीका करणं सोपं, सुधारणा घडवणं कठीण- सरन्यायाधीश दीपक मिश्रा

शबरीमला खटला-शबरीमला संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 10 ते 50 या वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश नाकारणे हे धार्मिक उपासनेच्या अधिकाराचा भंग करणारे आहे का हे तपासून कोर्ट निर्णय देणार आहे. अर्थात सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्याकडे केवळ 25 दिवसांचा अवधी आहे. या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या खटल्यांवर त्यांना निर्णय द्यावा लागेल.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDeepak Mishraदीपक मिश्राCourtन्यायालय