शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

आबा जोड२

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

सामान्यांचा आवाज हरपला - सुधीर पारवे

सामान्यांचा आवाज हरपला - सुधीर पारवे
माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाने सामान्यांचा आवाज हरपला आहे. राजकीय क्षेत्रात जिल्हा परिषद सदस्य पदापासून तर गृहमंत्री म्हणून त्यांनी संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. मात्र नियतीने अचानक घाला घातला आणि सामान्यांसाठी लढणारा हा लढवय्या आज नियतीपुढे मात्र हरला. त्यांच्या निधनाने राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे.
- सुधीर पारवे,
आमदार, उमरेड.
.......
सर्वसामान्यांच्या नेत्याला गमावले - श्रावण पराते
आबा एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांना राजकीय वारसा नव्हता. अशाही सर्वसामान्य परिस्थितीवर मात करीत उपमुख्यमंत्री, गृहमंत्रिपदाची धुरा त्यांनी यथोचितपणे सांभाळली. एवढ्या मोठ्या पदावर पोहचत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. आजच्या दूषित राजकारणातून एक स्वच्छ प्रतिमेचा नेता गेल्याने राजकीय, सामाजिक हानी झाली आहे.
- श्रावण पराते,
माजी मंत्री.
....
महाराष्ट्राची हानी - राजीव पोतदार
माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे निधन हे महाराष्ट्रासाठी धक्कादायक असून, राज्याने उमद्या आणि तडफदार नेत्याला गमावले. ग्रामीण भागातील प्रश्नांची, समस्यांची त्यांना जाण होती. छोट्या पदापासून मोठ्या पदापर्यंत त्यांनी न्यायपूर्ण आणि यशस्वी जबाबदारी सांभाळली. सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला आपण गमावले.
- डॉ. राजीव पोतदार,
जिल्हाध्यक्ष, भाजप.