शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"मोदी जी चाय पकोडे", मोदींच्या भाषणाने प्रेरित होऊन युवकाने सुरू केला व्यवसाय, भावाला बनवले पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 17:20 IST

बिहारमधील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन स्वत:चा व्यवसाय उभारला आहे.

Inspiration From PM Narendra Modi Speech । गया : बिहारमधील गया जिल्ह्यातील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने प्रेरित होऊन स्वत:चा व्यवसाय उभारला आहे. गया जिल्ह्यातील चेरकी शेरघाटी मुख्य रस्त्यावर 'मोदी जी चाय पकोडे' हे दुकान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आत्मनिर्भर' भाषणाने प्रेरित होऊन स्थानिक बलवीर चंद्रवंशी नावाच्या तरुणाने छोट्या हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला त्याची आजूबाजूच्या लोकांनी खूप खिल्ली उडवली, पण आज या बलवीरचे सर्वजण कौतुक होत आहे. चहा पकोडे विकून बलवीरने आज त्याच्या भावाला पोलीस अधीक्षक बनवले आहे. याशिवाय त्याने परिसरातील तरूणांना रोजगार दिला आहे.

बलवीर चंद्रवंशीने सांगितले की, इंटरमिजिएटचे शिक्षण घेतल्यानंतर चार वर्षांपूर्वी तो रोजगाराच्या शोधात कोलकाता येथे गेला होता. तिथल्या एका खासगी कंपनीत काही दिवस काम करूनही चांगली नोकरी न मिळाल्याने तो घरी परतला. कुटुंब चालवण्यासाठी पुढे काय करायचे ही चिंता त्याला शांत बसू देत नव्हती. याच कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर होण्यासाठी दिलेली भाषणे ऐकून त्याला प्रेरणा मिळाली. त्यानंतर तो आपल्या गावी आला. गावातच चहा पकोड्यांचे दुकान उघडले ज्यातून आज भरपूर कमाई होत आहे.

स्थानिक लोकांमध्ये दुकानाची क्रेझदेशाचे पंतप्रधान मोदींच्या नावाने दुकान उघडले आणि शुध्द मोहरीच्या तेलात बनवलेले पकोडे बनवायला सुरूवात केली, जे इथे खूप प्रसिद्ध झाले आहेत. बलवीरने दुकानाच्या नावासोबत पंतप्रधान मोदींचा फोटो देखील लावला आहे. या रस्त्यावरून जाताना चहा आणि पकोड्यांचा शौकीन असणारा माणूस इथे नक्कीच थांबतो आणि याचा आस्वाद घेतो. या चहा पकोड्यांच्या दुकानातून आलेल्या पैशातून बलवीरने त्याच्या लहान भावाला शिकवून अधीक्षक बनवले असल्याचे बलवीरने सांगितले. याच वर्षी बलवीरचा लहान भाऊ जयंत कुमार याची पोलीस अधिकारी म्हणून निवड झाली आहे. खरं तर याचे संपूर्ण श्रेय जयंतने त्याचा मोठा भाऊ बलवीर चंद्रवंशी याला दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :BiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसायPoliceपोलिसInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी