शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवविवाहितेचा कट! पार्लरमध्ये जाते सांगितलं, प्रियकराला बोलावलं पण पतीला सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 18:58 IST

लग्नाच्या २५ व्या दिवशी नवविवाहिता पतीला सोडून प्रियकरासह पळून जात होती.

बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. इथं नवविवाहित महिलेनं लग्न होऊन १ महिना न होताच जे केलं त्यानं सर्वांनाच धक्का बसला. लग्नाच्या २५ व्या दिवशी ती पतीला सोडून प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, वाटेत पतीनं तिला गाठलं अन् हे प्रकरण पोलिसांत पोहोचलं. शुक्रवारी संबंधित महिला तिच्या पतीसोबत बाजारात निघाली होती. अशातच तिनं पार्लरला जाते असं सांगून तिथून पळ काढला. खूप वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. तितक्यात पतीनं तिला दुसऱ्याच्या गाडीत बसल्याचे पाहून एकच गोंधळ घातला. मग स्थानिकही त्याच्या मदतीला धावले. 

दरम्यान, आपल्या पत्नीला अनोळखी व्यक्तीच्या वाहनात पाहून पती घाबरला. त्यानं आरडाओरडा केल्यानंतर बघ्यांची गर्दी जमली आणि पोलिसांनाही याची माहिती मिळाली. काही वेळातच पोलीस तिथे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत नवविवाहित महिला, तिचा पती आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेले. नवविवाहितेच्या पतीनं सांगितलं की, त्याचा विवाह ११ मार्च २०२४ रोजी झाला होता. पत्नीनं त्याला दमदाटी करून आपल्या माहेरी जाण्याचा आग्रह धरला होता. 

आत्महत्येची दिली धमकी पत्नीच्या आग्रहास्तव पती तिला घेऊन त्याच्या सासरच्या घरी निघाला होता. मात्र, पत्नीनं प्रियकरासह पळून जाण्याचा कट रचला होता. नवविवाहित महिलेनं पोलिसांना सांगितलं की, माझ्या विरोधाला न जुमानता कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी जबरदस्तीनं माझं लग्न लावून दिलं. मला आजही माझ्या प्रियकरासोबत राहायचं आहे. यानंतरही जबरदस्ती झाली तर मी आत्महत्या करून जीवन संपवेन. पण, मी माझ्या पतीसोबत राहणार नाही. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदार