शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"खिडकीजवळ गॅप अन् टिश्यू पेपर; तेव्हाच ठरवलेलं नेपाळ विमानाने कधीही प्रवास करणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:10 IST

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताने एका मोठ्या कंपनीच्या संस्थापकावर दहशत पसरली आहे.

नवी दिल्ली: पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळचेविमान रविवारी कोसळून ६८ जण ठार झाले होते. त्यातील ३५ जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अपघातग्रस्त विमानातील चारजण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताने एका मोठ्या कंपनीच्या संस्थापकावर दहशत पसरली आहे. याचदरम्यान स्नॅपडील या कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ कुणाल बहल यांचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी पोखराहून कधीही विमानाने प्रवास करू नका असे म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या जुन्या अनुभवांचा संदर्भ देत हे ट्विट केले आहे.

कुणाल बहल नेपाळमध्ये वारंवार होणाऱ्या विमान अपघातांमुळे घाबरले असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेपाळच्या विमान कंपनीच्या विमानांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मला अशा भयानक अपघाताची अपेक्षा होती. मी नेपाळमधील विमान कंपनीकडे तक्रार करुनही दुर्लक्ष केल्याचे कुणाल बहाल यांनी म्हटलं आहे. 

कुणाल बहल यांनी ट्विटमध्ये त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचा संदर्भ देत  लिहिले की, 'ही घटना खरोखरच खूप दुःखद आहे. काही वर्षांपूर्वी माझी पोखराहून फ्लाइट होती. मी जेव्हा विमानाने प्रवास करत होतो तेव्हा खिडकीच्या कोपऱ्यातून हवेचा जोरदार प्रवाह येत होता. मी तक्रार केल्यावर त्या अटेंडंटने टिश्यू पेपर आणला आणि जिथून हवा येत होती तो गॅप भरला. या अनुभवानंतर मी ठरवलं होतं की, पोखराहून पुन्हा कधीच फ्लाइट घेणार नाही.

३० वर्षांत २७ अपघात-

नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये २७ प्राणघातक विमान अपघात झाले. १९९२ मध्ये दोन मोठे विमान अपघात झाले होते. जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ११३ जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळून त्यात सर्व १६७ जणांचा मृत्यू झाला होता.

हिमालयाचे आव्हान

नेपाळमध्ये वैमानिकांना खरे आव्हान हिमालयातील उंच पर्वत शिखरांचेच आहे. जुनाट विमानेही अपघातांना हातभार लावत आहेत. दुर्गम पर्वतीय भूभाग, प्रतिकूल हवामान, जुनी विमाने आणि अनुभवी वैमानिक यामुळे नेपाळला उड्डाणासाठी सर्वात धोकादायक देश बनवले आहे.

टॅग्स :Nepalनेपाळairplaneविमान