शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

‘इंडिया’कडून मोदींना कडवी टक्कर, २०२४ मध्ये कोण बाजी मारणार? समोर आली अशी आकडेवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 22:35 IST

Loksabha Election 2024: आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल याचा अंदाज घेणारा टाइम्स नाऊ-नवभारतने केलेला सर्व्हे समोर आला आहे.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने उरले आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल याचा अंदाज घेणारा टाइम्स नाऊ-नवभारतने केलेला सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून देशात अनेक ठिकाणी मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये कडवी टक्कर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर करण्यात आलेल्या या सर्व्हेनुसार देशभरात एनडीए आणि इंडियामध्ये कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे. आज लोकसभेची निवडणूक झाल्यास एनडीएला एकूण मतांपैकी ४२ टक्के मतं मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला ४० टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.

 जागांचा विचार केल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९६ ते ३२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला १६० ते १९० जागा मिळण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपा पुन्हा एकदा मुसंडी मारण्याची शक्यता असून, इथे भाजपाला ६९ ते ७३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला इखे ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. बसपाला ० ते १ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यामध्ये १ ते ३ जागा जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस