शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

चंद्रावर एकूण १४ लाख खड्डे, २९० किमीचा सर्वात मोठा खड्डा; यामागील नेमकं कारण काय?, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:48 IST

व्हिडिओत चंद्राचा पृष्ठभाग निळसर हिरव्या रंगाचा दिसत असून तिथे अनेक खड्डे दिसत आहे.

नवी दिल्ली: २२ दिवसांनी प्रवास करुन भारताचे चंद्रयान-३ सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत पोहचले. कक्षेत प्रवेश केल्यानंतर रविवारी चंद्राची पहिली प्रतिमा पृथ्वीर पाठवली. चंद्रयान-३ मिशनच्या ट्विटर हँण्डलवर इस्रोने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत चंद्राचा पृष्ठभाग निळसर हिरव्या रंगाचा दिसत असून तिथे अनेक खड्डे दिसत आहे. मात्र चंद्र असा का आहे?, चंद्रावर इतके खड्डे का आहेत?, यामागील कारण नक्की जाणून घ्या...

पृथ्वी आणि चंद्राची गोष्ट जवळजवळ एकाच वेळी सुरू होते. ही गोष्ट सुमारे ४५० कोटी वर्षे जुनी आहे. तेव्हापासून आजतागायत अंतराळातून येणारे दगड आणि उल्का या दोघांवर सतत पडत आहेत. त्यांच्या पडण्यामुळे खड्डे तयार होतात. त्यांना इम्पॅक्ट क्रेटर असेही म्हणतात. चंद्रावर सुमारे १४ लाख खड्डे आहेत. ९१३७ पेक्षा जास्त खड्डे ओळखण्यात आले आहेत. मात्र आणखी हजारो खड्डे मानवाला बघताही आलेले नाही. कारण त्याची गडद बाजू पाहणे अवघड आहे. तसेच काही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील तयार होतात. 

NASAने १७ मार्च २०१३ रोजी चंद्रावरील सर्वात मोठे विवर पाहिले. जेव्हा ४० किलो वजनाचा दगड ताशी ९० हजार किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला. या धडकेने २९० किलोमीटरचा खड्डा निर्माण झाला. आपण ते जमिनीवरून देखील पाहू शकता. दुर्बिणीतून पाहिल्यास अतिशय विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल. चंद्रावर पाणी नाही. वातावरणही नाही. पृथ्वीसारख्या टेक्टोनिक प्लेट्सही नाहीत. त्यामुळे तिथे माती कापली जात नाही. धूप होत नाही. त्यामुळे हे खड्डे भरले जात नाही. 

पृथ्वीवरील अशा खड्ड्यांवर माती गोठते. पाणी भरते. झाडे आणि वनस्पती वाढतात. त्यामुळे खड्डे भरले आहेत. चंद्रावर बनवलेल्या बहुतेक खड्ड्यांचे वय २०० दशलक्ष वर्षे आहे. म्हणजेच चंद्र तयार झाला तेव्हा त्यावर इतके खड्डे नव्हते. चंद्रावरील सर्वात मोठे विवर दक्षिण ध्रुवाजवळ आहे. ते ओलांडण्यासाठी तुम्हाला त्याच्या आत सुमारे २९० किलोमीटर चालावे लागते. चंद्रावर १३ लाख खड्ड्यांचा व्यास १ किलोमीटर आहे. ८३ हजार खड्ड्यांचा व्यास ५ किलोमीटर आहे. तर ६९७२ खड्ड्यांचा व्यास २० किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

दरम्यान, चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास चांद्रयानाचे आणखी दोन टप्पे असतील. येत्या १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि २३ ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जेव्हा चांद्रयान-३ लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असं करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. यापूर्वी हा पराक्रम केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच करता आला आहे. चांद्रयान-३चे रोव्हर ज्या भागात उतरणार आहे, त्या भागावर आतापर्यंत कोणत्याही देशाचा रोव्हर नसल्याने या कामगिरीकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो