शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चंद्रावर एकूण १४ लाख खड्डे, २९० किमीचा सर्वात मोठा खड्डा; यामागील नेमकं कारण काय?, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:48 IST

व्हिडिओत चंद्राचा पृष्ठभाग निळसर हिरव्या रंगाचा दिसत असून तिथे अनेक खड्डे दिसत आहे.

नवी दिल्ली: २२ दिवसांनी प्रवास करुन भारताचे चंद्रयान-३ सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत पोहचले. कक्षेत प्रवेश केल्यानंतर रविवारी चंद्राची पहिली प्रतिमा पृथ्वीर पाठवली. चंद्रयान-३ मिशनच्या ट्विटर हँण्डलवर इस्रोने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत चंद्राचा पृष्ठभाग निळसर हिरव्या रंगाचा दिसत असून तिथे अनेक खड्डे दिसत आहे. मात्र चंद्र असा का आहे?, चंद्रावर इतके खड्डे का आहेत?, यामागील कारण नक्की जाणून घ्या...

पृथ्वी आणि चंद्राची गोष्ट जवळजवळ एकाच वेळी सुरू होते. ही गोष्ट सुमारे ४५० कोटी वर्षे जुनी आहे. तेव्हापासून आजतागायत अंतराळातून येणारे दगड आणि उल्का या दोघांवर सतत पडत आहेत. त्यांच्या पडण्यामुळे खड्डे तयार होतात. त्यांना इम्पॅक्ट क्रेटर असेही म्हणतात. चंद्रावर सुमारे १४ लाख खड्डे आहेत. ९१३७ पेक्षा जास्त खड्डे ओळखण्यात आले आहेत. मात्र आणखी हजारो खड्डे मानवाला बघताही आलेले नाही. कारण त्याची गडद बाजू पाहणे अवघड आहे. तसेच काही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील तयार होतात. 

NASAने १७ मार्च २०१३ रोजी चंद्रावरील सर्वात मोठे विवर पाहिले. जेव्हा ४० किलो वजनाचा दगड ताशी ९० हजार किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला. या धडकेने २९० किलोमीटरचा खड्डा निर्माण झाला. आपण ते जमिनीवरून देखील पाहू शकता. दुर्बिणीतून पाहिल्यास अतिशय विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल. चंद्रावर पाणी नाही. वातावरणही नाही. पृथ्वीसारख्या टेक्टोनिक प्लेट्सही नाहीत. त्यामुळे तिथे माती कापली जात नाही. धूप होत नाही. त्यामुळे हे खड्डे भरले जात नाही. 

पृथ्वीवरील अशा खड्ड्यांवर माती गोठते. पाणी भरते. झाडे आणि वनस्पती वाढतात. त्यामुळे खड्डे भरले आहेत. चंद्रावर बनवलेल्या बहुतेक खड्ड्यांचे वय २०० दशलक्ष वर्षे आहे. म्हणजेच चंद्र तयार झाला तेव्हा त्यावर इतके खड्डे नव्हते. चंद्रावरील सर्वात मोठे विवर दक्षिण ध्रुवाजवळ आहे. ते ओलांडण्यासाठी तुम्हाला त्याच्या आत सुमारे २९० किलोमीटर चालावे लागते. चंद्रावर १३ लाख खड्ड्यांचा व्यास १ किलोमीटर आहे. ८३ हजार खड्ड्यांचा व्यास ५ किलोमीटर आहे. तर ६९७२ खड्ड्यांचा व्यास २० किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

दरम्यान, चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास चांद्रयानाचे आणखी दोन टप्पे असतील. येत्या १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि २३ ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जेव्हा चांद्रयान-३ लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असं करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. यापूर्वी हा पराक्रम केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच करता आला आहे. चांद्रयान-३चे रोव्हर ज्या भागात उतरणार आहे, त्या भागावर आतापर्यंत कोणत्याही देशाचा रोव्हर नसल्याने या कामगिरीकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो