शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चंद्रावर एकूण १४ लाख खड्डे, २९० किमीचा सर्वात मोठा खड्डा; यामागील नेमकं कारण काय?, पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 12:48 IST

व्हिडिओत चंद्राचा पृष्ठभाग निळसर हिरव्या रंगाचा दिसत असून तिथे अनेक खड्डे दिसत आहे.

नवी दिल्ली: २२ दिवसांनी प्रवास करुन भारताचे चंद्रयान-३ सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत पोहचले. कक्षेत प्रवेश केल्यानंतर रविवारी चंद्राची पहिली प्रतिमा पृथ्वीर पाठवली. चंद्रयान-३ मिशनच्या ट्विटर हँण्डलवर इस्रोने त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत चंद्राचा पृष्ठभाग निळसर हिरव्या रंगाचा दिसत असून तिथे अनेक खड्डे दिसत आहे. मात्र चंद्र असा का आहे?, चंद्रावर इतके खड्डे का आहेत?, यामागील कारण नक्की जाणून घ्या...

पृथ्वी आणि चंद्राची गोष्ट जवळजवळ एकाच वेळी सुरू होते. ही गोष्ट सुमारे ४५० कोटी वर्षे जुनी आहे. तेव्हापासून आजतागायत अंतराळातून येणारे दगड आणि उल्का या दोघांवर सतत पडत आहेत. त्यांच्या पडण्यामुळे खड्डे तयार होतात. त्यांना इम्पॅक्ट क्रेटर असेही म्हणतात. चंद्रावर सुमारे १४ लाख खड्डे आहेत. ९१३७ पेक्षा जास्त खड्डे ओळखण्यात आले आहेत. मात्र आणखी हजारो खड्डे मानवाला बघताही आलेले नाही. कारण त्याची गडद बाजू पाहणे अवघड आहे. तसेच काही ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे देखील तयार होतात. 

NASAने १७ मार्च २०१३ रोजी चंद्रावरील सर्वात मोठे विवर पाहिले. जेव्हा ४० किलो वजनाचा दगड ताशी ९० हजार किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळला. या धडकेने २९० किलोमीटरचा खड्डा निर्माण झाला. आपण ते जमिनीवरून देखील पाहू शकता. दुर्बिणीतून पाहिल्यास अतिशय विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल. चंद्रावर पाणी नाही. वातावरणही नाही. पृथ्वीसारख्या टेक्टोनिक प्लेट्सही नाहीत. त्यामुळे तिथे माती कापली जात नाही. धूप होत नाही. त्यामुळे हे खड्डे भरले जात नाही. 

पृथ्वीवरील अशा खड्ड्यांवर माती गोठते. पाणी भरते. झाडे आणि वनस्पती वाढतात. त्यामुळे खड्डे भरले आहेत. चंद्रावर बनवलेल्या बहुतेक खड्ड्यांचे वय २०० दशलक्ष वर्षे आहे. म्हणजेच चंद्र तयार झाला तेव्हा त्यावर इतके खड्डे नव्हते. चंद्रावरील सर्वात मोठे विवर दक्षिण ध्रुवाजवळ आहे. ते ओलांडण्यासाठी तुम्हाला त्याच्या आत सुमारे २९० किलोमीटर चालावे लागते. चंद्रावर १३ लाख खड्ड्यांचा व्यास १ किलोमीटर आहे. ८३ हजार खड्ड्यांचा व्यास ५ किलोमीटर आहे. तर ६९७२ खड्ड्यांचा व्यास २० किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

दरम्यान, चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास चांद्रयानाचे आणखी दोन टप्पे असतील. येत्या १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि २३ ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जेव्हा चांद्रयान-३ लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असं करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. यापूर्वी हा पराक्रम केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच करता आला आहे. चांद्रयान-३चे रोव्हर ज्या भागात उतरणार आहे, त्या भागावर आतापर्यंत कोणत्याही देशाचा रोव्हर नसल्याने या कामगिरीकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रो