शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

सासू आणि जावयाच्या प्रेमकहाणीत आता तिसऱ्या व्यक्तीचीही एंट्री, समोर आली अशी माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 10:36 IST

Relationship News: मुलीचं लग्न ठरलेल्या तरुणासोबत सासू पळून गेल्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील सासू आणि जावयाच्या या प्रेमप्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे.

मुलीचं लग्न ठरलेल्या तरुणासोबत सासू पळून गेल्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील सासू आणि जावयाच्या या प्रेमप्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात आणखी एक गौप्यस्फोट झाला असून, दोघांचं सूत जुळवून देणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. सासू अनिता हिचा होणारा जावई राहुल याने डिसेंबर २०२४ पासून तिच्यासोबत फोनवरून बोलण्यास सुरुवात केली होती. याबाबत अनिताचा पती जितेंद्र याने सांगितले की, त्यांच्या होणाऱ्या जावयाला सासूचा मोबाईल नंबर त्याच्या भाओजीकडून  मिळाला होता.

अनिता देवीच्या पतीने याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमचा होणारा जावई राहुल याचा भाओजी रुद्रपूरमध्ये राहतो. तो मेहंदी लावण्याचं काम करतो. त्याचं माझी पत्नी अनिता देवी हिच्यासोबत दोन तीन वेळा बोलणं झालं होतं. राहुल जेव्हा त्याच्या भाओजीकडे गेला, तेव्हा त्याच्याकडूनच त्याने सासूचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर अनिता आणि राहुल यांची फोनाफोनी सुरू झाली.

जितेंद्र यांनी पुढे सांगितले की, सुरुवातीला अनिता आणि राहुल बोलायचे तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं. मात्र सासू आणि जावयाचं नातं पवित्र असल्याने मला संशल आला नाही, तसेच मीही त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र या दोघांचं बोलणं अधिकच वाढलं. पुढे पुढे बोलणं वाढत गेलं. सुरुवातीला दोन तास, तीन तास नंतर पाच तास बोलणं त्यांचं होऊ लागलं. शेवटी शेवटी तर दोघेही वीस वीस तास बोलण्यात गुंतून राहू लागले.

माझ्या मुलीचा विवाह ऑगस्ट महिन्यात ठरला होता. मात्र डिसेंबर महिन्यात होणाऱ्या जावयाने आपल्या सासूसोबतच अधिकाधिक बोलण्यास सुरुवात केली. लग्नाची सर्व तयारी झाली होती. तसेच मी लग्नाची पत्रिका देण्यासाठी मेहुणीकडे गेलो होतो, त्याच दिवशी अनिता होणाऱ्या जावयासोबच पळून गेली, असे जितेंद्र यांनी सांगितले.  

टॅग्स :FamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपUttar Pradeshउत्तर प्रदेश