शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

एक रिचार्ज प्लॅन तरी 28 ऐवजी 30 दिवसांचा हवा, ट्रायचे दूरसंचार कंपन्यांना निर्देश; १ जूनपासून अंमलबजावणी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 08:56 IST

Mobile Recharge: बहुतांश खासगी दूरसंचार कंपन्या प्रीपेड ग्राहकांना २८ दिवसांचा रिचार्ज मासिक प्लॅन म्हणून विकतात. त्याबाबत तक्रारी वाढल्यामुळे ट्रायने गंभीर दखल घेत, किमान एक रिचार्ज प्लॅन २८ ऐवजी ३० दिवसांचा ठेवा, असे निर्देश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत.

मुंबई : बहुतांश खासगी दूरसंचार कंपन्या प्रीपेड ग्राहकांना २८ दिवसांचा रिचार्ज मासिक प्लॅन म्हणून विकतात. त्याबाबत तक्रारी वाढल्यामुळे ट्रायने गंभीर दखल घेत, किमान एक रिचार्ज प्लॅन २८ ऐवजी ३० दिवसांचा ठेवा, असे निर्देश दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. या निर्णयाची येत्या १ जूनपासून अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

देशातील सर्वच दूरसंचार कंपन्यांच्या मासिक प्लॅनची वैधता २८ दिवस आहे. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात १२ ऐवजी १३ वेळा रिचार्ज करावे लागते. एक महिन्याचे अतिरिक्त शुल्क कंपन्या त्यांच्याकडून आकारतात, असा ग्राहकांचा आक्षेप होता. 

पोस्टपेड प्लॅनसाठी देयकसाखळी ही ३० दिवसांची, तर प्रीपेड ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मासिक प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. सर्व ग्राहकांसाठी ३० दिवसांची देयकसाखळी का नाही, असा सवाल उपस्थित करीत, ट्रायने याबाबत स्पष्टीकरण देण्याची सूचना केली होती. दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे.

निर्णयाच्या अंमलबजावणीस ६० दिवसांची मुदतट्रायने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, टेलिकॉम कंपन्यांकडील किमान एक प्लॅन संपूर्ण महिन्यासाठी वैध असावा, तसेच प्रत्येक कंपनीच्या प्लॅनमध्ये महिन्यासाठी वैध असलेले एक विशेष व्हाउचर, कॉम्बो व्हाउचर ठेवावे लागेल. दर महिन्याला त्याचे नूतनीकरण करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात यावी. या निर्णयाच्या अंमलबजावणीस ६० दिवसांची मुदत देण्यात येत असून, १ जूनपासून एक महिना वैध असलेला रिचार्ज बाजारात आणावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय