शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:09 IST

"यासंदर्भात मी बैठकीत ठरवेन, काय बोलायचे ते. आता तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे, तो आमचा अधिकार आहे. तेवढं तरी आम्हाला ठरवू द्या..."

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात दिल्लीतमहायुतीतील काही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, हेदेखील दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना मुख्यमंत्री पदासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे 'मी काही ज्योतिष नाही', असे उत्तर दिले.

काय म्हणाले अजित दादा? -अजित दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणखी पाच वर्षे वाटावे लागेल का? असा प्रश्न विचारला असता, "मी काही ज्योतिषी नाही. यासंदर्भात आज रात्री आमची चर्चा होईल. आम्ही देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे आमचे लक्ष आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत, असे अजित पवार म्हणाले.

अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतले जाणार आहे का, असा काही फॉर्म्युला आहे का? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, "अरे राज्याचे सरकार आहे. १३-१४ कोटी लोकांचे नेतृत्व करायचे आहे. आम्ही एका विचाराने पुढे चाललो आहोत. आमचे ध्येय राज्याचा सर्वांगीण विकास करणे आहे. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याच बरोबर, पूर्वीच्या योजनां कशा व्यवस्थित चाललीत आणि आश्वासनांची पूर्तता कशी होईल? हे आमचे पहिले लक्ष आहे."

तुमच्या पक्षाला केंद्रात मंत्रीपद मिळेल का? असे विचारले असता, "यासंदर्भात मी बैठकीत ठरवेन, काय बोलायचे ते. आता तुम्हाला कशाला सांगू? काय बोलायचे, तो आमचा अधिकार आहे. तेवढं तरी आम्हाला ठरवू द्या," असे अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारdelhiदिल्लीMahayutiमहायुती